ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्याने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआएची ताकद वाढली आहे. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येण्यात आयएसआयचा मोठा वाटा असून, आयएसआयने आपला मोर्चा भारताकडे वळवला आहे. आयएसआयने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी पाठविण्यास सुरूवात केली आहे.
लष्कर-ए-तोएबा, जेईएम आणि अल-बद्रच्या दहशतवाद्यांना आयएसआयने जम्मू-काश्मीरमध्ये पाठवले आहे. सद्यस्थितीत जम्मू-काश्मीरमध्ये 200 दहशतवादी सक्रिय असून, आयएसआयच्या आदेशानुसार ते घातपात घडवू शकतात. त्यामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. सीमेवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.