शाहू व ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जयसिंगपूर/ प्रतिनिधी
कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने जनतेला विश्वास देत शासकीय नियमांचे पालन करीत शहर कोरोना मुक्त व सुरक्षित ठेवले असताना काही लोकप्रतिनिधी व त्यांच्या अनुयायांनी राजकीय द्वेषातून मुख्याधिकारी टिना गवळी व पालिका प्रशासनास दोषी ठरवत संपूर्ण यंत्रणा खिळखिळी करण्याचा प्रयत्न होत असल्याने पालिकेतील शाहू व ताराराणी आघाडीतील 21 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मुख्याधिकारी व प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत विश्वास व्यक्त केला आहे. केवळ राजकीय स्वार्थापोटी रात्रंदिवस काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना नाउमेद व खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. जयसिंगपूर शहरामध्ये राज्य शासन व जिल्हाधिकारी यांच्या सूचना व आदेशाप्रमाणे संपूर्ण शहरात लोक डॉन च्या काळात पालिका प्रशासन यंत्रणा गतिमान आहे. तिसऱ्या टप्प्यापर्यंत शहरात एकही बाधित रुग्ण नव्हता मात्र चौथ्या टप्प्यामध्ये सोलापूर हुन आलेल्या तीन रुग्ण बाधित असल्याने त्यांना मुख्याधिकारी टिना गवळी यांनी शहरात प्रवेश देतानाच संस्था कोर टाइम केल्यानेच पुढील अनर्थ टळला आहे. गेल्या तीन महिन्यापासून सर्वच अधिकारी कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस कार्यरत आहेत. त्यांना जनते बरोबरच अनेक सेवाभावी संस्थांसह पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे म्हणूनच आज शहर सुरक्षित आहे. या काळात सर्वांनीच राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून कार्यरत राहणे गरजेचे असताना खासदार धैर्यशील माने यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये नगराध्यक्षा नीता माने यांनी सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मुख्याधिकारी यांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला.
या बैठकीला 2 नगरसेवक वगळता बाकीचे नगरसेवक गैरहजर होते केवळ राजकीय स्वार्थ साधण्याच्या उद्देशाने व्यक्ती द्वेषातून आढावा बैठकीमध्ये विषय मांडणाच्या प्रयत्न झाल्याची चर्चा असून यातून शहराची व रात्र न दिवस काम करण्याऱ्या पालिका कर्मचाऱ्यांची बदनामी झाली. म्हणूनच मुख्याधिकारी व प्रशासनाची बाजू घेत त्याच्या कामाचे समर्थन करीत दोन्ही आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदनाद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये कशापद्धतीने कामकाज केले याची माहिती सादर केली.