मिरची उत्पादनात घट होऊन शेतकऱयांना लाखो रु.चा फटका बसण्याची शक्यता
वार्ताहर / जांबोटी
खानापूर तालुक्मयाच्या पश्चिम भागात शेतकरी उन्हाळी लवंगी मिरची पीक मोठय़ा प्रमाणात घेतात. यातून शेतकऱयांना आर्थिक मोबदला चांगला प्रमाणात मिळतो. मात्र, यावर्षी मिरचीवर तांबेरा रोग पडल्याने मिरची पिकाची वाढ खुंटली आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरीवर्गाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भात कापणीनंतर सुगीची कामे उरकून डिसेंबर महिन्यामध्ये शेतकरीवर्ग या भागात उन्हाळी मिरची लागवड करतो. त्यापासून शेतकऱयांना बऱयापैकी आर्थिक लाभ मिळतो. गोव्यासह किनारपट्टी भागात या मिरचीला मोठय़ा प्रमाणात मागणी असल्यामुळे शेतकऱयांना बऱयापैकी आर्थिक लाभ होतो. मात्र, चालूवषी या पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मिरची पिकाची वाढ खुंटली आहे. त्याचबरोबर लागवड केलेली मिरची रोपे पिवळट होऊन काही ठिकाणी मिरची रोपे मरून पडत आहेत. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
मिरची पीकच वाया जाण्याची भीती
साधारणपणे एप्रिलपासून मिरची उत्पादनाला प्रारंभ होतो. सध्या काही ठिकाणी मिरची रोपांना फुलधारणा झाली आहे. मात्र, फळधारणा अद्याप झाली नसल्यामुळे मिरची उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या अवकाळी पावसामुळे या पिकाला फटका बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. गोव्यासह किनारपट्टी भागात उन्हाळी मिरचीला (गिड्डी मिरची) मोठय़ा प्रमाणात मागणी असल्यामुळे दरवषी शेतकरीवर्ग साधारणपणे मे महिन्यापासून मिरची सुकवून विक्रीला काढतात. साधारणपणे 500 ते 600 रुपये प्रतिकिलो दराने या मिरचीची विक्री करण्यात येते. त्यामुळे शेतकऱयांना या मिरची उत्पन्नातून बऱयापैकी आर्थिक लाभ मिळतो. मात्र, सध्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मिरची पीक वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गातून वर्तविली जात आहे.
अद्याप मिरची पिकाच्या फळधारणेला प्रारंभ झाला नसल्यामुळे फळधारणा उशिरा झाल्यास जूनमध्ये सुरू होणाऱया पावसामुळे पिकलेली मिरची सुकविणे शेतकऱयांना मुश्कील जाते. पावसामुळे मिरची पीक कुजण्याची शक्मयता अधिक असल्यामुळे या भागात मिरची उत्पादनात घट होऊन शेतकरीवर्गाला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसण्याची शक्मयता
आहे.
शेतकरीवर्गाला मार्गदर्शनाची गरज
मिरची पिकासाठी उत्पादन खर्च मोठय़ा प्रमाणात येतो. मात्र, या पिकावर झालेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरीवर्ग आर्थिक संकटात जाण्याची शक्मयता आहे. कृषी आणि बागायत खात्याच्या अधिकारीवर्गाने लक्ष घालून मिरची पिकावर पडलेल्या रोगासाठी औषध आणि कीटकनाशके फवारणीसाठी शेतकरीवर्गाला मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.