त्या दिवशी सकाळीच डोअर बेल वाजली. शिशिर, शर्मिष्ठा आणि त्यांचे गोंडस कन्यारत्न हातात बुके घेऊन उभे होते. दार उघडले. येऊ का मॅडम? अरे..या ना. बसा. इकडेच निघालो होतो. म्हटलं तुम्हाला भेटून जावं. बरं केलंत. तुम्ही बसा..मी चहा ठेवलाच आहे. आपण चहा घेत बोलू.
हं..घ्या..कसे आहात? शर्मिष्ठा -एकदम मस्त मॅडम.
शिशिर-हो.. एकदम उत्तम. तूर्तास तरी घटस्फोट घेण्याचा शर्मिष्ठाचा विचार नाही. दोघेही या वाक्मयावर अगदी खळाळून हसले. व्वा!! छानच..आनंद आहे. हो मॅडम. अलीकडेच माझा एक कथासंग्रह प्रकाशित झाला. तोही द्यावा म्हटलं तुम्हाला. सगळं आता छान चाललंय.
शर्मिष्ठा -हो मॅडम. तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट न चुकता फॉलो करते आहे. सगळं ओके आहे आता. परंतु एकदा वेळ घेऊन निवांतपणे भेटायला येणार आहे मी. शिशिर-अजून आहेच का? बघा हो मॅडम..सांगा याला..अगं थट्टा करतोय तो. तू ये नक्की. शिशिर-हवं तर प्रेमानी थट्टा करतोय असं म्हणूया. शिशिर…असे म्हणत शर्मि÷ाने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि तिच्यासोबत आम्हीही हसू लागलो. बरं मॅडम येतो आता. पुस्तक वाचून प्रतिक्रिया नक्की कळवा असे म्हणत ते बाहेर पडले. शिशिर आणि शर्मिष्ठा यांची केमेस्ट्री पाहून समाधान वाटले.
उच्चशिक्षत, तरुण असे हे देखणे जोडपे. शिशिर एका कंपनीमध्ये मोठय़ा हुद्यावर होता आणि सिद्धहस्त लेखकही! तसे छोटेच कुटुंब. घरात सर्व प्रकारची समृद्धी. लग्नाला सात-आठ वर्ष झालेली. पती पत्नी आणि त्यांची मुलगी असा परिवार!शिशिरची परगावी बदली झाली. दोन वर्षासाठी मुलीची शाळा, सगळे रुटिन बदला या साऱया गोष्टी नकोत म्हणून शर्मि÷ाने त्याच शहरात राहायचा निर्णय घेतला. शिशिरहीनेही तो मान्य केला. शनिवार-रविवार तो घरी यायचा. असा जीवनप्रवास सुरू होता.
साधारणतः दहा एक महिन्यापूर्वी या जोडप्याची आणि माझी पहिली भेट झाली. मला भेटायला आलेल्या शर्मि÷ाची तक्रारींची भली मोठ्ठी यादी होती. हल्ली खूप अस्वस्थ वाटते, कशातच लक्ष लागत नाही, अनेकदा कसलातरी ताण जाणवतो, काही वेळा धड झोपही येत नाही, कुणाला माझी किंमतच नाही, शिशिरचे प्रेमच कमी झाले, त्याचे लक्ष नसते, आता काहीच नको वाटतंय.. घटस्फोटाचा विचार मनात येतो. काय करावं सुचत नाही, अशा अनेक गोष्टी ती मांडत होती. मधेच रडतही होती. बोलताना तिची ‘असुरक्षिततेची भावना’ माझ्या लक्षात आली होती. त्या भावनेच्या मुळापर्यंत पोचण्यासाठी सविस्तर चर्चेची गरज होती. समस्येचे मूळ आणि नेमके स्वरूप कळले की समस्येची उकल आणि उपाययोजना करणे सोपे जाते. परंतु त्याआधी तिच्या नवऱयाची बाजू नेमकी काय आहे हे समजून घेणे ही आवश्यक होते. तिच्याजवळ थोडी चर्चा झाल्यानंतर शिशिरसोबत स्वतंत्रपणे बोलणे झाले. मुळातच तिचा काळजी करण्याचा स्वभाव, त्यातून होणारा प्रश्नांचा मारा, त्याची बदली झाल्यापासून सुरू झालेली ही समस्या आदी गोष्टी अधोरेखित झाल्या.
पुन्हा तिच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. हळूहळू एकएक गोष्टी उलगडत होत्या. तिची होणारी चिडचिड आणि सतत वाटणारी काळजी याचे मूळ बालपणामध्ये दडले होते. लहानपणी आईसोबत बाजारात गेलेली असताना तिने एक विचित्र अपघात पाहिला होता. ज्यामधे एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. त्यावेळी ती खूप घाबरली आणि ते स्वाभाविकही होते. आईने तिला खूप समजावले. त्यावेळी ती शांतही झाली परंतु तो प्रसंग तिच्या मनावर इतका कोरला गेला की आजही ती आठवण तिला नकोच वाटायची. जेव्हा तो प्रसंग आठवायचा तेव्हा तिला दरदरून घाम फुटायचा. हे सारे नकोच म्हणून नीमूटपणे त्या घटनेची वाच्यताही ती टाळायची. मलाही त्याविषयी सांगताना तिची अस्वस्थता मी पाहिली होती. अपघाताच्या भीतीने ती आपल्या मुलीलाही नजरेआड होऊ द्यायची नाही. दर शनिवार-सोमवार प्रवास करणारा आपला पती नीट येईल ना, सुखरूप पोहचेल ना याची चिंता तिला अस्वस्थ करायची. मग सतत फोन, त्याला फोन करायला थोडा जरी विलंब झाला तरी मग चिडचिड, घरी आला की प्रश्नांचा मारा. सततच्या या वातावरणामुळे शिशिरलाही त्रास व्हायचा परंतु वाद नको म्हणून तो स्वतःला वाचनात गुंतवून घ्यायचा. तिने या सगळय़ाचा सोयीस्कर अर्थ असा काढला होता की शिशिरचे तिच्यावरचे प्रेम कमी झाले, तो बदलला. परंतु वस्तुस्थिती वेगळी होती. घडून गेलेली घटना, त्यावर बोलणे टाळणे, मनामध्ये घोळवत ठेवलेले स्वगत, त्यातून निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना, चिडचिड अस्वस्थता अशा अनेक गोष्टी होत्या. परंतु सविस्तर चर्चेनंतर तिने यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करण्याची मनापासून इच्छा दर्शविली. स्वगताची तर्कशुद्ध छाननी, दोघांच्याही वर्तनामध्ये आवश्यक असलेले बदल, सजगतेची काही तंत्रे हे टप्प्याटप्याने आत्मसात करत पाच-सहा महिन्यांच्या कालावधीत गाडी बरीचशी रुळावर आली, त्यानंतरही फोनवरून संपर्क सुरूच होता आणि त्यादिवशीच्या भेटीनंतर त्यांची बदललेली केमेस्ट्री प्रत्यक्ष पहायला मिळाली.
अनेकदा वरकरणी दिसणारी समस्या वेगळी असते आणि त्या समस्येच्या मुळाशी अवास्तव भावनांचा गुंता असतो आणि मूळ समस्या त्या गुंत्यामध्ये अडकून राहते. अशावेळी जवळच्या कुणा व्यक्तीने कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला सोयीस्कर वाटणाऱया समजुतींना आपण इतके घट्ट धरून ठेवतो की, समोरच्या व्यक्तीच्या सांगण्याची दखल घेतली जात नाही आणि समायोजनाच्या पातळीवर घोटाळा होऊ लागतो त्यातून नवीन समस्या जन्म घेतात. शर्मि÷ाच्या बाबतीत नेमके हेच घडत होते. तिच्या नवऱयाने सुरुवातीला काही काळ हरएक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘जखम मांडीला नि मलम शेंडीला’ असाच काहीसा प्रकार होत होता. त्यामुळे समस्या सुटण्याऐवजी आणि क्लिष्ट झाली होती.
खरंतर आपला मेंदू हा अगदी बारीकसारीक तपशील साठवून ठेवणारा एक संगणक आहे. घडणारी प्रत्येक घटना सर्व भावभावनांसकट त्यामधे साठवली जात असते. त्यामुळेच ज्यावेळी आपल्याला जुने काही प्रसंग आठवतात तेव्हा ते तितक्मयाच उत्कटतेने जाणवत राहतात. या गोष्टी सुखद असतील तर ठीक परंतु क्लेशकारक असतील आणि संयम या नावाखाली त्या आपण दडपून ठेवल्या तर मग सारेच अवघड होऊन बसते. संयम राखणे म्हणजे भावना दडपून टाकणे अशी काहींची समजूत असते. परंतु असे केल्याने विघातक भावनांचा कचरा मनाच्या कोपऱयात साठत राहतो आणि मानसिक अस्वास्थ्याच्या नांदीसोबतच अवघे जीवननाटय़ नीरस करून टाकतो.
भावना या वर्तनासाठी, कृतीसाठी, जगण्यासाठी प्रेरीत करत असतात. त्यामुळे त्याबाबत सजग असणे आवश्यक आहे. भावनांच्याबाबतीत सजग राहिल्याने त्याला योग्य वळण देणे शक्मय होते आणि समायोजन क्षमता, स्वीकार यांचा परिघ वाढवता येतो. मानसिक आरोग्य चांगले राखणे शक्मय होते. संपूर्णतः ताणविरहित आयुष्य असे कधी नसतेच. गतीसाठी थोडा ताण हा आवश्यक असतो परंतु अती आणि अनावश्यक ताण मात्र थकवा आणतो. ज्या पद्धतीने आपण पंख्याचा वेग आवश्यकतेनुसार कमी अधिक करतो, नियंत्रित करतो तसेच भावभावनांच्या बाबतीत सजग राहिल्याने भावनांचा आवेग अस्वस्थता, ताण नियंत्रित करता येतो. भावनांचे नियोजन, सजगता याविषयी एकाच लेखात मांडणे शक्मय नाही त्यामुळे याविषयी अधिक माहिती पुढच्या लेखामध्ये!
Ad. सुमेधा देसाई, मो.94226 11583