प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात बुधवारी सकाळी संपलेल्या 24 तासाता करवीर तालुक्यात सर्वाधिक 98.36 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 10.14 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सकाळपासून संततधार सुरु होती. तर दुपारी दोन वाजनेच्या सुमारास सुमारे अर्धा तास शहर परिसरात जोरदार सरी कोसळल्याने जयंती नाला ओव्हरफ्लो झाला आहे. दुपारी तीन नंतर पावसाचा जोर ओसरला मात्र रात्री उशिरापर्यंत रिपरीप सुरुच होती.
गेली दोन दिवसांपासून जिल्हय़ात हंगामपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱयास पाऊस पडल्याने अनेक घरांची पडझड झाली तर रस्त्याकडेचे वृक्ष कोसळून काही मार्गही बंद झाले होत. मंगळवारी दिवसभर पावसाने उसंत टाकली होती. मात्र रात्रीपासून पुन्हा जोर धरला. रत्नागिरी किनार्यावर निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्याने लगतचा जिल्हा म्हणून कोल्हापुरालाही सावधानतेचा इशारा दिला होता. बुधवारी सकळपासून संततधार सुरु होती. त्यामुळं पंचगंगा, कृष्णा, वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. चार दिवसांपूर्वी 9 फुटांवर असलेला राजाराम बंधारा 11 फुटांवर दुपारी 3 नंतर पाणीपातळीत वाढ होत राजारामा बंधाऱयाची पाणी पातळी 13 फुटांच्या वर होती.
तालुका निहाय पाऊस (मिमि)
हातकणंगले 20, शिरोळ 10.14, पन्हाळा 66 शाहूवाडी, 73 राधानगरी 49.83, गगनबावडा 59.50, करवीर 98.36, कागल63.29, गडहिंग्लज40.14, भुदरगड 66.20, आजरा 80.25, चंदगड 74.50
राधानगरी धरणात 39 दलघमी पाणीसाठा असून कोयनेतून दुसऱया दिवशीही 2100 क्युसेक विसर्ग करण्यात आला. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत किंचित वाढ झाली आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील नदीकाठावरील शेतकऱयांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मंगळवारी सकाळी राधानगरी धरणातून 800 क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.
धरणातील पाणीसाठा (दलघ)
तुळशी 46.66, वारणा 322.21, दूधगंगा 212.08, कासारी 21.38, कडवी 30.20, कुंभी 27.05, पाटगाव 22.92, चिकोत्रा 13.87, चित्री 13.05, जंगमहट्टी 9.54 ,घटप्रभा 14.34, जांबरे 6.31, कोदे 1.38
बंधार्यांची पाणी पातळी (फुटात)
राजाराम 11, सुर्वे11.10, रुई 39, तेरवाड, 36.6 शिरोळ, 27 नृसिंहवाडी, 18 राजापूर 11.6, सांगली 5.9, अंकली 7.3