प्रलंबित कामे पूर्ण करा : दुष्काळाचा सर्व्हे संपवा
प्रतिनिधी/ बेळगाव
जिह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांकडून अहवाल घेतला आहे. याचबरोबर प्रलंबित असलेली कामे तातडीने पूर्ण करा, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी अधिकाऱयांना केली आहे.
यावषी महापुरामुळे रस्ते, गटारी, घरांचे याचबरोबर सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. त्याचा सर्व्हे पूर्ण झाला असला तरी काही ठिकाणी अजूनही तक्रारी वाढल्या आहेत. तेव्हा आपापल्या विभागांमध्ये अधिकाऱयांनी गाव पातळीवर जाऊन सर्व्हेबाबतचा अहवाल घ्यावा तसेच ज्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही त्यांना देण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली आहे.
सरकारकडून आलेला निधी पूर्ण खर्च झाला पाहिजे. सर्वसामान्य जनतेसाठी तसेच अनुसूचित जाती-जमातीसाठी मिळालेला निधी त्या त्या विभागात खर्च करा. कोणताही निधी परत जाणार नाही याची दक्षता घ्या, अशी सूचनादेखील जिल्हाधिकाऱयांनी केली आहे. याबाबत अधिकाऱयांना येणाऱया अडचणींची चर्चा बैठकीत करण्यात आली. काही ठिकाणी सर्व्हे करताना एकाच उताऱयावर किंवा एकाच घराच्या उताऱयावर 4 ते 5 जणांची नावे आहेत. त्यामुळे समस्या निर्माण होत आहेत, असे काही अधिकाऱयांनी सांगितले. त्यावर जिल्हाधिकाऱयांनी उताऱयावर नाव असलेल्या सर्वांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढा, असे सांगण्यात आले.
यावषी महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पाण्याची सर्वत्र उपलब्धता असली तरी उन्हाळय़ामध्ये पुन्हा पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्मयता आहे. तेव्हा आताच त्याबाबत आराखडा तयार करा, असे जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना सांगितले. या बैठकीला जिह्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.