विनय गौडा पदभार स्वीकारण्यास नाराज
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाचे रुग्ण जिह्यातील 1500 गावांपैकी 900 ते हजार गावात आढळून येत आहेत.जिह्याचा कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.आरोग्य यंत्रणेला प्रेरणा व पाठबळ देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून असणे गरजेचे आहे.त्याकरता नव्याने बदली झालेले विनय गौडा यांनी अजून पदभार स्वीकारला नाही.तर संजय भागवत यांनी त्याच वेळी पदभार सोडला आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेत सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी विनाच कारभार सुरू आहे.
कोरोना काळात जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संजय भागवत यांनी अधिक चांगले काम केले.आरोग्य यंत्रणेला त्यांनी वारंवार योग्य त्या सूचना दिल्या.कोरोना रोखण्यासाठी ते नेहमीच ऑन लाईन सूचना आरोग्य विभागाला देत होते.जिह्यातील 71 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 400 उपकेंद्र आहेत.खाजगी दवाखाने आहेत.त्या यंत्रणाना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांना सूचना देत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संजय भागवत हे चांगले काम करत होते.परंतु त्यांची अचानक बदली झाली.त्यांच्या जागी नव्याने विनय गौडा यांची बदली झाली. गौडा यांनी आजपर्यंत पदभार स्वीकारला नाही.त्यांनी पदभार स्वीकारला गेला नसल्याने जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारीच सध्या नाही, अशी अवस्था झाली आहे