अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार 14 नोव्हेंबर 2021, सकाळी 11.00
● शनिवारी रात्री अहवालात 31 बाधित
● एकूण 2,996 जणांची तपासणी
● सक्रिय रुग्णसंख्या फक्त 291
● पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 20 लाखानजिक
● सलग तेराव्या दिवशी वाढ 50 च्या खाली
● लसीकरण, जगरहाटीला आली गती
सातारा / प्रतिनिधी :
पाहता पाहता तब्बल वीस महिन्यानंतर कोरोनाच्या दोन लाटांचा प्रहार सहन केल्यानंतर सातारा जिल्हा सावरला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या एकूण व्यवस्थापनाची स्थिती समोर आली. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून आरोग्य यंत्रणा उभारावी लागली. हातांची स्वच्छता, मास्क सॅनिटायझरचा वापर या गोष्टी सातारकरांना नव्याने कळल्या आणि त्या पाळत असतानाच अनेकांच्या घरातील माणसेही कोरोनाचे बळी ठरले. आता गेल्या दोन महिन्यापासून बाधित वाढीचा आलेख दिलासादायकरित्या घसरलेला आहे. नोव्हेंबर महिन्यात तो गेल्या तेरा दिवसांपासून 50 च्या खाली राहिलेला आहे मात्र अल्प संख्येने सुरू असलेली बाधित वाढ अद्यापही सुरूच आहे.
शनिवारी अहवालात 31 बाधित
रविवारी सकाळी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या शनिवारी रात्रीच या अहवालानुसार एकूण 2 हजार 996 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये फक्त 31 जणांचा अहवाल बाधित आलेला असून 10 तारखेपासून बाधित वाढ 20 ते 30 संख्येच्या दरम्यान स्थिर आहे. यामध्ये पॉझिटिव्हिटी दर एक टक्केच्या खाली घसरला
होता. मात्र शनिवारच्या अहवालात तो पुन्हा 1.03 टक्के एवढा आहे.
जिल्ह्यात जगरहाटीला आली गती
गीता दोन महिन्यापासून जिल्ह्यातील कोरूना संसर्गाचा कहर कमी कमी होत गेला आणि नोव्हेंबर महिन्यात तो शुन्याकडे जात असताना जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व जगरहाटीला गती आली असून पुन्हा खुला श्वास घेत नागरिक दैनंदिन कामात गुंतलेले आहेत. दीपावलीचा उत्सव संपल्यानंतर आता पुन्हा अर्थचक्राला गती येण्याची गरज असून अनेक बाबी सुरू होताना बेरोजगारीचा मोठा मुद्दा समाजासमोर आहे. आता कोऱोनाबरोबर चालत राहत आणि त्याला हरवत या आव्हानांना पेलत माणसांचं जगणं सुसह्य करावं लागणार आहे.
पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 20 लाखानजिक
जिल्ह्यात सध्या दैनंदिन दहा हजारांच्या पुढे लसीकरण होत असून शनिवारी 11,256 जनांचे लसीकरण करण्यासाठी यामुळे एकूण येणाऱ्या नागरिकांची संख्या 29 लाख 12 हजार 938 एवढी झाली असन यामध्ये पहिला डोस देणाऱ्या नागरिकांची संख्या 19 लाख 81 हजार 435 तेवढे तर दुसरा डोस घेणाऱ्या या नागरिकांची एकूण संख्या 9 लाख 31 हजार 493 एवढी झालेली आहे.
शनिवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 22,59,726
एकूण बाधित 2,51,476
कोरोनामुक्त 2,44,033
एकूण मृत्यू 6,458
सक्रीय रुग्ण 291
शनिवारी जिल्हय़ात
बाधित 26
मुक्त 10
मृत्यू 01