वार्ताहर/कराड
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अत्यंत समर्थपणे महाराष्ट्र चालवत आहेत. उद्धव ठाकरे यांचे देशव्यापी नेतृत्व सिद्ध करण्यासाठी शिवसैनिकांनी त्यांचे हात बळकट करणे गरजेचे आहे. महाआघाडी म्हणुन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य वेळी आदेश देतील, मात्र शिवसैनिकांनी जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परीषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावर लाढवयाच्या आहेत. त्यादृष्टीने तयारीला लागावे अशा सुचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या
शिवसेनेच्या वतीने शनिवारी यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन येथे संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री उदय सामंत बोलत होते. यावेळी, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, उपनेते नितिन बानुगडे, जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, रामभाऊ रैनाक, शशिरराज करपे, अनिता जाधव, कराड व पाटण तालुक्यातील शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थीत होते. मेळाव्याला येण्यापुर्वी उदय सामंत यांनी दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अभिवादन केले.
मंत्री उदय सामंत म्ह्णाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातुन महाराष्ट्रात मोठे काम उभा रहात आहे. उद्धव ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवसैनिकांनी खऱया अर्थाने चळवळ राबवणे गरजेचे आहे. सरकारच्या माध्यमातुन राबवण्यात येणारी प्रत्येक योजना व काम तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. आपण काम मोठे करतो मात्र जनतेपर्यंत कमी पोहचवतो. मात्र यापुढे असे चालणार नाही. शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी शिवसैनिकांनी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्य जतनेपर्यंत पोहचवावे. येणारी प्रत्येक निवडणुक स्वबळावर लढवायची आहे. त्या दृष्टीने शिवसैनिकांनी आत्तापासुनच तयारीला लागावे असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी कले.
गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई म्ह्णाले की, कोरोना व अतिवृष्टच्या काळात सातारा जिल्ह्यात शिवसेनेच्या माध्यमातुन मोठे काम करण्यात आले. डोंगरदऱयात रहाणाऱया लोकांना दोन महिने पुरेल येवढे धान्य व जिवनावश्यक साहीत्याचा पुरवठा करण्यात आला. अतिवृष्टीच्या काळात शिवसैनिकांनी गावोगावी सुचवलेली कामे तत्काळ करण्यात आली आहेत. कोरोनाच्या काळात रूग्णांना बेड मिळवुन देण्यापासुन रेमडिसीव्हर उपलब्द करण्यासाठी शिवसैनिक पळाले आहेत. अनेक शिवसैनिकांनी कोरोना बाधितांना घरी जाऊन पोर्टेबल मशिनच्या सहाय्याने ऑक्सिजन पुरवण्याचे काम केले आहे. सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे काम चांगले सुरू आहे. पाटण तालुक्यात 72 टक्के ग्रामपंचायती शिवसेनेच्या विचराच्या आहेत. तर कराड तालुक्यातील काही ग्रामपंचायती व सदस्य शिवसेनेच्या विचारांचे आहेत. कराड नगरपालिकेची निवडणुक जवळ आली आहे. नगरपालिकेत स्वबळावर सत्ता नाही पण मोठया संख्येने शिवसेनेचे नगरसेवक पालिकेत प्रवेश करतील. यासाठी कराडच्या शिवसैनिकांना आवश्यक ते पाठबळ देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे शंभुराज देसाई यांनी सांगीतले. दरम्यान उपनेते नितीन बानुगडे यांनी मनोगत व्यक्त केले तर जिल्हाप्रमुख जयवंत शेलार यांनी प्रास्तावीक केले.
कुलदीप क्षिरसागर व रेश्मा पवार यांचा सत्कार
कराड तालुक्यातील चिखली येथील कुलदीप क्षिरसागर यांनी युवा सेनेत प्रवेश केल्यानंतर चिखली ग्रामपंचायतीत परीवर्तन करीत शिवसेनेच्या विचाराची सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले. तसेच गायकवाड वाडी येथे शिवसेनेच्या रेश्मा पवार सरपंच झाल्या. याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते कुलदीप क्षिरसागर व रेश्मा पवार यांचा सत्कार करण्यात आला.