अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार 7 फेब्रुवारी 2022, सकाळी 11.00
● पुन्हा जिल्हा सावरु लागला
● जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 11.42 वर
● बरे होण्याचे प्रमाण वाढले
● मृत्यूदर रोखण्यात यश
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात नव्याने होणारी बाधित वाढ रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. प्रशासनाच्यावतीने सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे नव्याने होणारी बाधित वाढ ही सोमवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात 203 जण बाधित आढळून आले आहेत. काल दिवसभरात 1778 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले होते. बाधित आढळून आलेल्या संख्येमुळे पॉझिटीव्हीटी 11.42 वर आला आहे. कोरोनामुक्तीचा दर वाढलेला आहे तर मृत्यूदर रोखला गेला आहे. जिल्हा पुन्हा एकदा सावरु लागला आहे.
जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 11.42 वर
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच गेल्या सात दिवसांमध्ये जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब घडू लागली आहे. नव्याने आढळून येणाऱ्या बाधितांच्या पेक्षा कोरोनामुक्तीचा दर जास्त आहे. कमी प्रमाणात बाधित आढळून येणाऱ्यांच्या संख्येमुळे जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी कमी होवू लागला आहे. ही दिलासादायक बाब ठरु लागली आहे. गेल्या सात दिवसांतील पाझिटीव्हीटी पहाता दि.1 रोजी 13.74, दि.2 रोजी 9.82, दि. 4 रोजी 12.98, दि. 5 रोजी 12.19, दि. 6 रोजी 10.59 तर दि. 7 रोजी 11.42 आहे. जिल्ह्याची पॉझिटीव्हीटी ही 15 च्या खाली आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब ठरु लागली आहे. जिल्हा आता सावरु लागला आहे.
कोरोनामुक्तीचा वेग वाढला
कोरोना झालेले उपचार घेवून चांगले ठणठणीत बरे होवून घरी परतण्याचे प्रमाण वाढले आहे. योग्य वेळी योग्य उपचार घेतले जात असल्याने फेब्रुवारी महिन्यामध्ये बाधितांच्या पेक्षा कोरोनामुक्त झालेले दुप्पटीने आहेत. तसेच जिल्ह्यात बरे होणाऱ्यांची संख्या चांगली असल्याने घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत. हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे 350 च्या आसपास असून मृत्यूदरही रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने सकारात्मक बाजू ठरु लागली आहे. जिल्हा पुन्हा सावरु लागला आहे.
सोमवारी
नमूने-1778
बाधित-203
सोमवारपर्यंत
नमुने-25,16,777
बाधित-2,78,198
मृत्यू-6,620
मुक्त-2,66,679