बेळगाव / प्रतिनिधी
जिल्हय़ातील ज्या तालुक्मयामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले नाहीत ते नऊ तालुके दि. 4 मे नंतर सर्वांसाठी खुले करण्याचे आदेश पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिले आहेत. गेल्या दीड महिन्यापासून शहरासह संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन होता. त्यामुळे नागरिकांना घरातच थांबावे लागत आहे. मात्र आता पालकमंत्र्यांनी तालुके खुले करण्याचे आदेश दिल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
जिल्हय़ातील बेळगाव, रायबाग आणि हुक्केरी या तालुक्मयांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या तिन्ही तालुक्मयांना रेड झोनमध्ये अजूनही टाकण्यात आले आहेत. मात्र इतर नऊ तालुक्मयांमध्ये एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे त्या तालुक्मयांतील अंर्तगत व्यवहार सुरळीत करावे, असे त्यांनी सांगितले आहे.
पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी हा आदेश दिल्यामुळे 4 मे नंतर तालुक्मयातील व्यवहार सुरळीत होणार आहेत. बेळगाव, रायबाग आणि हुक्केरी या तालुक्मयांमध्ये एकूण 73 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या तालुक्मयांतील व्यवहारांवर निर्बंध राहणार आहेत, असेही जगदीश शेट्टर यांनी स्पष्ट केले आहे.