- जोरदार पावसाला सुरुवात, शेतीच्या कामांना वेग
- हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
गेले पंधरा दिवस विश्रांती घेलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. पावसाचे जोरदार पुनरागमन झाल्याने खोळंबलेल्या शेतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान, हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने जिल्हा प्रशासनाने दक्षतेने आवाहन केले आहे. शुक्रवारी गेल्या चोवीस तासात 50 मि. मी. च्या सरासरीने पाऊस पडला असून मालवण तालुक्मयात सर्वाधिक 178 मि. मी. पाऊस पडला आहे.
जिल्हय़ात गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारली होती. अधूनमधून तुरळक पाऊस पडत होता. परंतु, भरडी शेतीची कामे थांबली होती. पाणी उपसून किंवा पंप लावून भातलावणी करण्याची पाळी शेतकरयांवर आली होती. आता मात्र पाऊस सक्रिय झाला आहे. मागील दोन दिवस थोडय़ा प्रमाणात पाऊस सुरू झाला. त्यानंतर आज शुक्रवारी जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.
24 तासात 50 मि. मी. च्या सरासरीने पाऊस
जिल्हय़ात शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात मालवण तालुक्मयात सर्वाधिक 178 मि. मी. पाऊस झाला आहे. जिल्हय़ात सरासरी 50 मि. मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 1250.14 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग- 52 (1306), सावंतवाडी- 34 (1484.10), वेंगुर्ला- 63 (1000), कुडाळ- 14 (1114), मालवण- 178 (1372), कणकवली- 17 (1321), देवगड- 22 (1129), वैभववाडी- 17 (1272), असा पाऊस झाला आहे.