प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हय़ासह कोकणातील अन्य जिल्हय़ात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कोकणातील सर्व किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान 30 ऑगस्ट रोजी कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात ताशी 55 कि.मी. वेगाने वारे वाहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असल्याने कोकणातील जिल्हा जिल्हा प्रशासनाने मच्छीमारांसह सागरात न जाण्याचा इशारा दिला आहे.