प्रतिनिधी/ सातारा
मान्सूला नुकतीच सुरूवात झाली असुन जिह्यात शुक्रवार सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 37 मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 227.1 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागानुसार यंदा मान्सूनची सुरूवातच अत्त्यंत चांगल्या प्रकारे झाली आहे.
जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांमध्ये मागील चार दिवसांपासून चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे आता खरीप हंगामाच्या पेरणीला ही सुरूवात करण्यात आली आहे. तालुक्यातील पावसाची नोंद पाहता सातारा- 42.5 (244.4) मि. मी., जावळी- 71.7 (367.2) मि.मी., पाटण-55 (319.5) मि.मी., कराड-31.4 (266.1) मि.मी., कोरेगाव-25.4 (161.2) मि.मी., खटाव-19.4 (110.3) मि.मी., माण- 11.6 (71.9) मि.मी., फलटण- 11.8 (81.7) मि.मी., खंडाळा- 46.6 (137.8) मि.मी., वाई-49.4 (244.8) मि.मी., महाबळेश्वर-73.4 (643) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तसेच कोयना धरणात शुक्रवारी अखेर पर्यंत 32.79 टीएमसी (32.75 टक्के) एवढा उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण क्षेत्रात झालेल्या पावसाची आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी 143 (728) मि.मी. आहे.