प्रतिनिधी
रत्नागिरी
सध्या जिह्यासमोर कोरोनाबरोबरच सारीचे संकट उभे राहिले आहे. सारी रूग्णांची संख्या 927 पर्यंत पोहचली असून आतापर्यंत 14 रूग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. सारीमध्ये अनेक आजारांचा समावेश असून हा समूहरोग गणला जातो. सारी आणि कोरोना हे वेगळे आजार असले तरी त्यांची प्राथमिक लक्षणे सारखीच आहेत. मात्र कोरोनाप्रमाणेच सारीचेही लवकर निदान झाल्यास रूग्ण पूर्णपणे बरा होवू शकतो.
सारी तापाच्या आजारात जंतूसंसर्ग होऊन सूज येते. न्यूमोनिया होवून रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण खालावते. त्यामुळे हृदय, मेंदू, किडनी यांच्या कार्यवर परिणाम होतो. या आजारामध्ये सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, ही लक्षणे असतात. शरीरात जंतूसंसर्ग झाल्याने वेळेवर निदान होत नाही, विषाणू रक्तात मिसळत असल्याने अनेकदा रक्त तपासणीनंतरही आजाराचे निदान होत नाही. या तापाची बहुतांश लीणे कोरोनाप्रमाणेच असल्याने रुग्णांचा गोंधळ उडतो. काही रुग्ण ताप लपवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे वेळीच निदान होऊन तातडीने उपचार सुरु हाऊ शकत नाहीत व रोग बळावतो. वरील प्रमाणे कोणतीही लीणे आढळल्यास तातडीने रुग्णालयात जाऊन तपासणी करून घेर्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्हय़ातील सारी रूग्णांची आकडेवारी
तालुका संख्या
मंडणगड 55
दापोली 62
खेड 64
चिपळूण 31
गुहागर 27
संमेश्वर 88
रत्नागिरी 336
लांजा 8
राजापूर 12
ग्रामीण 244
एकूण 927