प्रतिनिधी / सातारा
राज्य शासनाने 2013 मध्ये खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या राज्यातील 1061 जणांना फौजदार केले असून त्यात सातारा जिल्हा पोलीस दलातील 17 कर्मचाऱयांचा समावेश आहे.
पोलीस महासंचालक कायार्लयातील आस्थापणाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी याबाबतचे आदेश मंगळवारी जारी केले. अनेक वर्षांसून या कर्मचाऱयांचा लढा सुरु होता. उच्च न्यायालयाने या कर्मचाऱयांना सामावून घेण्याचे आदेश दिले होते. 1988 पर्यंत भरती झालेल्या कर्मचाऱयांना सेवाज्येष्ठतेच्या आधारावर ही नियुक्ती देण्यात आली आहे.
जिह्यातील भिमराव रामचंद्र यादव, प्रदीप महादेव पाटणकर, शशिकांत भुजंगराव क्षीरसागर, भरत ज्ञानदेव नाळे, मनोहर रामचंद्र फरांदे, विठ्ठल कृष्णा घाडगे, शिवाजी दगडू घोरपडे, कैलास भिमराव गोतपगार, देवानंद ज्ञानदेव तुपे, यशवंत सुरेश महामुलकर, शशिकांत कृष्णराव जाधव, दत्तात्रय हणमंत बुलुंगे, मदन उत्तम फाळके, विजय वसंतराव जाधव, सतिश दत्तात्रय मयेकर, अर्जून संपतराव चोरगे, प्रमोद वसंत सावंत या कर्मचाऱयांना फौजदार म्हणून बढती मिळाली आहे.