प्रतिनिधी/ बेळगाव
अतिवृष्टीमुळे जिह्यात 972 कोटी रुपयांची हानी झाली आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा मंगळवारी बेळगाव दौऱयावर येत आहेत. पिक हानी, घरांची पडझड यासंबंधी झालेल्या नुकसानीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या बेळगाव दौऱयाच्या पार्श्वभूमिवर सोमवारी सायंकाळी हिडकल जलाशय परिसरातील सभागृहात पालकमंत्र्यांनी अधिकाऱयांची बैठक घेतली. या बैठकीत अतिवृ÷ाrमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासह अनेक वरि÷ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.
पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर सर्वत्र खबरदारी घेण्यात आली आहे. पिक हानीचे संयुक्त सर्व्हेक्षण करण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी अधिकाऱयांना दिली आहे. जलाशयातून पाणी सोडताना माहितीची देवाण-घेवाण असावी. अचानक पाणी सोडल्यामुळे नदी काठावरील गावांना फटका बसतो. त्यामुळे समन्वय आवश्यक आहे. यंदा समन्वयामुळे परिस्थिती उत्तमरित्या हाताळण्यात आली आहे, असे सांगत पालकमंत्र्यांनी कोयना जलाशयातील पाणीसाठा व पाणलोट क्षेत्रातील पावसा संबंधी माहिती घेतली.
कोरोना परिस्थितीचाही घेतला आढावा
या बैठकीत पालकमंत्र्यांनी कोरोना परिस्थितीचाही आढावा घेतला. आतापर्यंत आरोग्य विभागाकडून कोणती व्यवस्था करण्यात आली आहे, यासंबंधीची माहिती घेतली. जिह्यात रासायनिक खतांची कमतरता नाही. सध्या मुबलक साठा आहे. शेतकऱयांना ते वेळेत पोहोचविण्यासाठी अधिकाऱयांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली.
पीक हानी, जीवीत हानी भरपाईसाठी केलेल्या प्रयत्नांची जिल्हाधिकाऱयांनी माहिती दिली. पाठबंधारे निगमचे उत्तर विभागाचे मुख्य अभियंते अरविंद कणगली, हिडकल जलाशयाचे कार्यकारी अभियंते आर. बी. धामण्णावर, पाठबंधारे विभागाचे अभियंते सी. डी. पाटील, कृषी खात्याचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, बागायत खात्याचे सहसंचालक रविंद्र हखाटी आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.