प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये कोरोनापासून बरे होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे आकडेवारीवरून दिसत आह़े मंगळवारी तब्बल 700 जणांनी कोरोनावर मात केल़ी तर जिह्यातील बरे होण्याचे प्रमाण आता वाढून 88.82 इतके झाले आह़े तसेच कोरोना रूग्णांमध्येही घट दिसून येत आह़े मागील 24 तासात जिह्यात 386 नवे कोरोनाबाधित रूग्ण मिळून आले आहेत़
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी जिह्यात 4 हजार 929 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 187 तर ऍन्टीजेन चाचणीत 183 तर मागील 16 असे 386 कोरोनाबाधित रूग्ण सापडल़े जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 64 हजार 595 इतकी झाली आह़े मागील 24 तासांमध्ये 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े जिह्यातील एकूण मृतांची संख्या आता 1 हजार 825 इतकी झाली आह़े तालुकानिहाय आकडेवारीनुसार, दापोली-2 रत्नागिरी-3 व संगमेश्वर-3 असे मृत्यू झाल़े तर रत्नागिरी जिह्याचा मृत्यूदर हा 2.83 इतका आह़े तर मंगळवारी 700 बरे झालेल्यांना घरी सोडण्यात आल़े तर उपचारात 4 हजार 985 रूग्ण असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.