प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यात अग्निशमन अधिकाऱयांची पदे आठ-दहा वर्षापासून रिक्त आहे. जिह्यात फायर ऑडिट करणारी यंत्रणाच नसल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयसह अन्य इमारतींचे फायर ऑडिटची पूर्तता अडचणीत आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट 2 दिवसात होणे यामुळे अशक्य बनले आहे. आज जिह्यातील अनेक इमारती फायर ऑडिट झाल्याचा दावा करतात मात्र यंत्रणाच नसताना हे कसे झाले ? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडवात 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्य सुन्न झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिह्यात फायर ऑडिट करण्याचे आदेश आहेत. उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी देखील रविवारी जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देऊन बालरुग्ण विभागाची पाहणी केली. यावेळी फायर ऑडिटसह अनेक त्रुटी पुढे आल्या. इमारतींचे आतापर्यंत स्ट्रक्चरल ऑडिट किंवा फायर ऑडिट केलेच नसल्याचे अधिकाऱयानी स्पष्ट केले. त्यावर 14 तारखेपर्यंत ऑडिट करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र त्यानंतर घेतलेल्या आढाव्यामध्ये भयानक वास्तव पुढे आले.
सध्याच्या प्रचलित नियमांनुसार 15 मिटरच्या वरील कोणत्याही रहिवासी किंवा व्यापारी इमारतीला महाराष्ट्र संचालक अग्निसुरक्षा महासंचालयनालय मुंबई यांच्या फायर ऑडिटचा अहवाल व परवानगी अनिवार्य आहे. या परवानगीमध्ये परिशिष्ट ‘अ’ मध्ये इमारतीला आवश्यक फायर फायटर सिलिंडर, पाण्याची वाहिनी व साठा, आपत्कालीन मार्ग आदी बारकाव्यांचा विचार केला जातो. परिशिष्ट ‘बी’ मध्ये या बाबी तपासून त्या कार्यान्वित आणि प्रभावी आहे का, याची चाचणी घेऊन ती परवानगी दिली जाते. वर्षाला त्याचे नूतनीकरण करणे अपेािrत आहे. मात्र आतापर्यंत या परवानग्या एकतर कागदावरच आहेत किंवा घेतलेल्याच नाहीत, हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
भंडाऱयाच्या दुर्घटनेत यंत्रणा जागी झाली असली तरी जिह्यात फायर ऑडिट करणारी यंत्रणाच नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यासाठी अग्निसुरक्षा महासंचालनालयाने अनेक ठिकाणी खासगी ऑडिटरांची नियुक्ती केली आहे. रत्नागिरी पालिकेचे राज्यस्तरीय संवर्गामध्ये अग्निशमन अधिकारीपद आठ ते दहा वर्षे रिक्त आहे. त्यामुळे जिह्यात फायर ऑडिटचेच ऑडिट करण्याची वेळ शासकीय यंत्रणांवर आली आहे. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱयानीही याला दुजोरा दिला.