प्रतिनिधी/ सातारा
नैसर्गिक आपत्ती व पूर परिस्थितीबाबत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष एक जूनपासून कार्यरत झाले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रास्तरावर सुमारे 86 वैद्यकीय मदत पथके सुसज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी दिली.
कोरोनाचा बाधितांचा आकडा वाढला असून धास्ती अद्याप कायम आहे. मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळयात अधिक काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी उपाय योजना केल्या आहेत. जिह्यात 72 प्राथमिक आरोग्य केंद्र, 400 उपकेंद्र, 17 आयुर्वेद दवाखाने यांच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गेम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात येत आहेत. 1 जून पासून जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 24 तास साथरोग नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य पेंद्राकडे एक वैद्यकीय मदत पथक याप्रमाणे जिह्यात 72 व 11 तालुकास्तरावर प्रत्येकी 1 आणि जिल्हा स्तरावर 3 अशी वैद्यकीय मदत पथके सुसज्ज ठेवली जाणार आहेत. जिल्हास्तरावर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांची तीन मोबाईल पथके तयार केली असून सर्वच आरोग्य केंद्रावर पुरेसा औषध साठा उपलब्ध केला आहे. प्रत्येक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी इमर्जन्सी औषध किट तयार ठेवण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचाऱयांना पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दि. 1 ते 30 जूनअखेर सर्व गावांत, वाडी वस्तीच्या ठिकाणी साथरोग जनजागरण अभियान व हिवताप जनजागरण मोहिम राबविण्यात येणार आहे. सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व खातेप्रमुखांना क्लोरिन टेस्टर देण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये पाणी उद्भवतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने पाणी शुद्धीकरणाबाबत लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. गाव, वाडी वस्तीनिहाय सर्वत्र टीसीएल साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या स्त्राsताच्या ठिकाणची पाहणी करून पाणी नमुने तपासणीसाठी देण्यात येणार असल्याचे डॉ, आठल्ये यांनी सांगितले.