प्रतिनिधी/ सातारा
जिह्यातील आतापर्यंत दोन्ही डोस घेतलेले 38 लाख 65 हजार 140 जण झालेले आहेत. पहिला डोस घेतलेले 22 लाख 48 हजार 775 जण झाले आहेत तर दुसरा डोस घेतलेले 16 लाख 16 हजार 365 जण झाले आहेत. दरम्यान, जिह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 50 हजार सानूग्रह अनुदान देण्यात येत असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच आठवडी बाजारात लसीकरण केल्याबाबत तपासणी करण्यासाठी पथक नेमण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये कोरोनाची नियमावली कडक केली असून एकच गेट सुरू ठेवले आहे. विनाकारण येणाऱयांवर प्रतिबंध करण्यात आलेला आहे. जिह्यात नव्याने 378 जण बाधित आढळून आले आहेत.
ङलसीकरणामध्ये खंडाळा तालुका अव्वलङ
जिह्यात लसीकरणामध्ये खंडाळा तालुका अव्वल आहे. खंडाळा तालुक्यातील पहिला डोस घेतलेली 1 लाख 31 हजार 385 तर दुसरा डोस घेतलेले 99 हजार 161 असे दोन्ही डोस घेतलेले 2 लाख 30 हजार 546 जण आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील 1 लाख 2 हजार 684 जण दोन्ही डोस घेतलेले आहेत. सातारा तालुक्यातील 7 लाख 33 हजार 790 जणांनी दोन डोस घेतलेले आहेत. कराड तालुक्यातील 7 लाख 49 हजार 511 जणांनी लस घेतली आहे. फलटण तालुक्यातील 4 लाख 22 हजार 455 जणांनी दोन डोस घेतलेले आहेत. खटाव तालुक्यातील 3 लाख 46 हजार 190 जण लसवंत झाले आहेत. माण तालुक्यातील 2 लाख 47 हजार 45 जण लसवंत आहेत. कोरेगाव तालुक्यातील 3 लाख 25 हजार 552 जण लसवंत झालेले आहेत. जावली तालुक्यातील 1 लाख 32 हजार 614 जण लसवंत झालेले आहेत. वाई तालुक्यातील 2 लाख 42 हजार 283 जण लसवंत झालेले आहेत. तर पाटण तालुक्यातील 3 लाख 32 हजार 470 जण लसवंत झालेले आहेत.
जिल्हा परिषदेत कडक नियमावली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत कडक नियमावली लागू करण्यात आलेली आहे. केवळ एकच प्रवेशद्वार सुरू ठेवण्यात आले आहे. कार्यलयीन वेळेत तपासणी करण्यासाठी दोन पथके नियुक्ती करण्यात आले आहेत. अभ्यंगतांनी येऊ नये यासाठी तीस जणांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
आठवडी बाजारात लसीकरण केल्याबाबत तपासणी करण्यासाठी पथक नियुक्ती
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ग्रामीण भागात आठवडी बाजार तसे दूध डेअरी येथे होत असलेल्या गर्दीच्या ठिकाणी लसीकरण पूर्ण झाले आहे का नाही याची तपासणी करण्यासाठी पथक नेमण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्याच्या वारसांना सानूग्रह अनुदान
कोविड-19 मुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्जदारास अर्ज करताना अडचणी येवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने अर्ज करण्याची नियमावली जाहीर केली आहे. अर्ज करण्यास काही अडचणी निर्माण झाल्यास 1077 हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेले आहे.
जिह्यात नव्याने 378 जण बाधित
जिह्यात नव्याने 378 जण बाधित आढळून आले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नव्याने बाधित पुढीलप्रमाणे जावली 13, कराड 74, खंडाळा 20, खटाव 14, कोरेगाव 15, माण 6, महाबळेश्वर 29, पाटण 22, फलटण 22, सातारा 124, वाई 24, इतर 15, एकूण 378. जिह्यातील आतापर्यंत बाधित व कंसात मृत्यू पुढीलप्रमाणेः- जावली 10,183(226), कराड 39,729(1,256), खंडाळा 14,362(198), खटाव 26,071(662), कोरेगाव 22,087(519), माण 18,149(429), महाबळेश्वर 4956(89), पाटण 10,271(379), फलटण 37,757(700), सातारा 52,940(1,547), वाई 15,982(405), इतर 2360(94), एकूण 2,54,847(6,504).