आतापर्यंत जिह्यातील 302 कोरोनाबाधित तर 151 जण कोरोनामुक्त
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या काही दिवसांपासून परराज्यातून येणाऱयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णही अधिक आढळताना दिसत आहेत. गेल्या आठदिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे साऱयांचेच लक्ष कोरोनाची लागण झालेल्या आकडय़ांकडे आहे. मंगळवारी बेळगाव जिह्याला दिलासा मिळाला. एकही रुग्ण आढळला नाही. सलग दोन दिवस रुग्ण आढळला नसल्यामुळे दिलासा मिळाला तरी राज्यात मात्र तब्बल 161 रुग्ण आढळले आहेत.
जिह्यामध्ये आतापर्यंत 302 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामधील 131 रुग्णांना घरी पाठवून देण्यात आले आहे. एक वृध्द महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतर सर्व रुग्ण बरे होत आहेत. असे असले तरी परराज्यातून येणाऱया रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत आहेत. त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. जिह्यातील रायबाग, रामदुर्ग, हुक्केरी, अथणी, चिकोडी, निपाणी, बैलहोंगल, बेळगाव तालुक्मयामध्ये रुग्ण आढळले आहेत.
कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 66 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 5 हजार 921 जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यामधील बऱयाच जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 3 हजार 248 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात मंगळवारी 164 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. आता सध्या राज्यातील 2 हजार 605 जणांवर उपचार सुरु आहेत.
राज्यातील अंतर्गत बससेवा सुरु झाली आहे. याचबरोबर परराज्यातून काही जण सेवासिंधू ऍपवरुन परवानगी घेवून दाखल होत आहेत. त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्यातून येणाऱयांवर करडीनजर ठेवण्यात आली आहे. गेल्यादोन दिवसांपासून बेळगाव जिह्याला दिलासा मिळाला आहे. याचबरोबर बऱयाच जणांना सात दिवसानंतर होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे.