ऑनलाईन टीम/तरुण भारत
1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर झाल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. आता त्यांनी ट्विटरवरुन पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी राहुल गांधींनीचीनचा हवाला देत केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी ट्विटरवर ‘भारतासाठी जुमला आणि चीनसाठी नोकऱ्या’ असे लिहून सरकारची खिल्ली उडवली आहे. तसेच राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटसोबत एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये चीनमधून होणाऱ्या आयातीबाबत काही आकडेवारी सादर केली आहे. तसेच, राहुल गांधींच्या संसदेतील भाषणाची क्लिपही दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “भारतासाठी जुमला, चीनसाठी नोकऱ्या…मोदी सरकारने भारतात सर्वाधिक नोकऱ्या निर्माण करणारे संघटित क्षेत्र आणि एमएसएमई नष्ट केले.”
शेअर केलेल्या ट्वीटमध्ये राहुल गांधी यांनी चीनमधून होणाऱ्या आयातीबाबतची काही आकडेवारी सादर केली आहे. याशिवाय त्यांनी संसदेतील एका भाषणाची देखील क्लिपही शेअर करत यात त्यांनी “भारतासाठी जुमला, चीनसाठी नोकऱ्या…मोदी सरकारने भारतात सर्वाधिक नोकऱ्या निर्माण करणारे संघटित क्षेत्र आणि MSME नष्ट केले आहेत, असे म्हटले आहे.