डेंग्यूवर नियंत्रणासाठी आरोग्य खात्याकडून उपाययोजना
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात कोरोना पाठोपाठ साथीच्या रोगांचा प्रसारही वाढत आहे. डेंग्यूसारख्या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य खात्याने पावले उचलली आहेत. राष्ट्रीय रोगराई नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जुलै महिना ‘डेंग्यू प्रतिबंधक मास’ आचरणात येणार असल्याची माहिती रोग नियंत्रण अधिकारी डॉ. एम. एस. पल्लेद यांनी दिली.
डेंग्यू-ज्वरमुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिसून येत आहे. डेंग्यू हा आजार डासांपासून होत असून, एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी जाणाऱया डासांमुळेच डेंग्यूचा प्रसार होत आहे. विशेषतः साठविलेल्या स्वच्छ पाण्यावरच डेंग्यू पसरविणारे डास अंडी घालतात. तेथूनच डेंग्यूचा प्रसार होत असल्याचे डॉ. पल्लेद यांनी सांगितले. पाणी साठविण्यासाठी वापरण्यात येणाऱया टाक्मया, बॅरल, एअर कूलर आदी प्रथम रिकामी करणे आवश्यक आहे. साठविलेल्या पाण्यावर झाकण घालणे गरजेचे आहे. पाणी टंचाईमुळे काही नागरिक पाणी साठा करून ठेवतात. पण या पाण्यावरच डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे स्वरक्षणासाठी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. शक्मयतो पाणी साठा करू नये, आवश्यकता भासल्यास पाणी साठा करावा व त्यावर व्यवस्थित झाकण ठेवावे. कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आल्यास 104 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. डेंग्यू, ज्वर किंवा चिकुनगुनियामुळे शरीरातील पांढऱया पेशींची संख्या कमी होते. अशावेळी आवश्यक उपचार घेण्यासाठी रुग्णालयात संपर्क साधावा, असे मार्गदर्शन करण्यात आले.