मातेला वाचवण्यात अपयश, खानापुरातील शासकीय रुग्णालयातील हृदयद्रावक घटना : पत्नीच्या मृत्युमुळे पती गहिवरला
वार्ताहर /खानापूर
महिलेचे बाळंतपण म्हणजे त्या महिलेचा पुनर्जन्म समजला जातो. पण अनेकवेळा प्रयत्न करूनही गर्भवती महिलांना प्राणास मुकण्याची वेळ येते. अलीकडच्या काळात आधुनिक सुविधा तसेच आरोग्य खात्याने अनेक योजना अमलात आणून बाळ व बाळंतीण यांना सुरक्षित ठेवण्यासाठी योजना आणल्या आहेत. पण अनेकवेळा प्रयत्न करूनही अपयशाला सामोरे जावे लागते. यामध्ये कधी त्या मातेचा मृत्यू तर कधी जन्माआधीच नवजात शिशुचा मृत्यू झाल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. पण कधी आईच्या मृत्यूनंतर बाळांचा जन्म झाल्याची घटना क्वचित घडते. अशीच एक घटना खानापूर येथील शासकीय रुग्णालयात शुक्रवारी घडली.
आईच्या मृत्यूनंतर अवघ्या काही मिनिटात शस्त्रक्रिया करून दोन जुळय़ा बहिणींना सुखरूपपणे जीवदान दिल्याची घटना घडली. पण या प्रसंगात आईचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाल्याने नातेवाईकांसह शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱयांना अश्रू अनावर झाले.
याबाबत हकीकत की, खानापूर तालुक्मयातील गंगवाळी येथील अश्विनी अरुण शिंदे ही 29 वषीय महिला आपल्या तिसऱया बाळंतपणासाठी खानापूर शासकीय रुग्णालयात गुरुवारी दाखल झाली होती. सदर महिलेची दोन बाळंतपणे यापूर्वी खानापूर शासकीय रुग्णालयात नॉर्मल झाली होती. त्यामुळे पुन्हा तिसऱया बाळांच्या बाळंतपणासाठी सदर गर्भवती महिलेच्या पतीने खानापूर येथील शासकीय रुग्णालयात गुरुवारी दाखल केले होते.
प्रथम बाळ आडवे नंतर रक्तदाब वाढल्याचा परिणाम
शासकीय रुग्णालयातील प्रसूती तज्ञ डॉक्टर नारायण वडीनावर यांनी सदर गर्भवती महिलेचा वैद्यकीय अहवाल तपासला होता. पण रक्तदाब कमी-जास्त होत असल्याचेही डॉक्टरांच्या लक्षात आले होते असे समजते. अशा परिस्थितीत अनेक गर्भवती महिलेना रक्तदाब कमी जास्त होत असतो. त्यामुळे डॉ. नारायण वडीनावर तसेच परिचारिकांनी सदर महिलेला धीर देत बाळंतपण करण्याचे धाडस दाखविले. सदर महिलेला जुळी असल्याचेही डॉक्टरांच्या लक्षात आले. पण ज्यावेळी महिलेला वेदना असह्य होऊ लागल्या, त्यावेळी नॉर्मल डिलिव्हरी होणे अवघड झाल्याने डॉक्टरांनी सदर महिलेचा पती तसेच नातेवाईकांना बोलावून दोन जुळय़ा बाळांपैकी एक बाळ पोटात आडवे असल्याने नॉर्मल डिलिव्हरी होणे अवघड असल्याची सूचना केली. त्यावेळी सदर महिलेने तसेच तिच्या पतीच्या संमतीवरून शस्त्रक्रियेद्वारे दोन्ही बाळांना सुखरूप जन्म देण्याचा प्रयत्न करण्याचे निश्चित झाले. सदर महिलेला शस्त्रक्रिया वॉर्डात आणले असता अचानकपणे तिचा रक्तदाब कमी, जास्त होऊ लागला व रक्तदाबाचा ताण वाढल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. परिचारिका व डॉक्टरांची एकच धावपळ सुरू झाली. तेवढय़ात सदर महिलेचा ऑक्सिजन लेव्हल 60 पेक्षा कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डॉक्टर्ससह परिचारिकांची एकच धावपळ वाढली. तोवर त्या महिलेची प्राणज्योत मालवली, हे लक्षात येताच डॉक्टरांनी त्या महिलेच्या पतीसह कुटुंबांना तात्काळ पाचारण करून हकीकत सांगितली. तसेच बाळाच्या आईची शाश्वती नाही पण बालकांना जन्म द्यायचा असेल तर अवघ्या काही सेकंदात शस्त्रक्रिया करून बालकांना जीवदान देणे अत्यंत गरजेचे असल्याची कल्पना पतीला दिली. तात्काळ पती अरुण शिंदे यांनी पत्नीलाही वाचवण्याचा प्रयत्न करा. शिवाय मुलांनाही वाचवा… अशी आर्त हाक दिली. डॉक्टर व परिचारिकांनी धाडस करून महिलेची प्राणज्योत मावळल्याच्या काही क्षणातच शस्त्रक्रिया करून त्या दोन बाळांना सुखरूप जन्म दिला.
पण त्या महिलेच्या मृत्यूनंतर बाळांच्या नाळेपर्यंत आईच्या मृत्यूची बाधा पोहोचली होती. त्यानंतर अधिक उपचारासाठी बेळगाव येथे त्यांना पाठवण्यात आले. तिकडे त्या बाळंतीण महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने एकच सर्वत्र शोककळा पसरली. सदर महिलेच्या मृत्यूची बातमी नातेवाईक व गावकऱयांना कळताच शासकीय रुग्णालयात एकच गर्दी झाली. त्या सर्वांना परिस्थितीची कल्पना देण्यात आली. त्यानंतर सदर महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
हृदयदाबामुळे प्रसूती करणे बनले अवघड …
सदर महिलेचे बाळंतपण तसेच बाळ-बाळंतिणीला वाचवण्यासाठी आपण व आपल्या परिचारिकांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. जुळे असल्याने शस्त्रक्रिया करणे अनिवार्य होते. यासाठी सदर महिलेचा पती अरुण यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला. पण शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच सदर महिलेला अचानकपणे तीव्र हृदयदाबाचा झटका आला. त्यामुळे केवळ अवघ्या दहा ते पंधरा सेकंदामध्ये बाळंतिणीला वाचवावे की बाळाला, असा प्रश्न निर्माण झाला व तातडीने महिलेच्या पतीची संमती घेऊन शस्त्रक्रिया करून बाळांना जीवदान द्यावे लागले.
– डॉ. नारायण वडीनावर प्रसूती तज्ञ, तालुका आरोग्य केंद्र खानापूर