बहुतांश वेळा जेवल्याबरोबर पाणी पिऊ नये असा सल्ला दिला जातो. लहान मुलांना घरातील ज्येष्ठ लोक नेहमीच याविषयी सांगतात. परंतु जेवण झाल्याबरोबर लगेच पाणी का पिऊ नये, याचे नेमके कारण सर्वांनाच माहिती असते नाही. ङडॉक्टरांच्या मते जेवल्या जेवल्या पाणी प्यायल्यास अन्न पचनात अडथळे येतात. जेवणातील प्रथिने आणि अन्य पोषक घटक शोषून घेण्यास आतडय़ांना वेळ लागतो.
- जेवल्यावर लगेचच पाणी प्यायल्यास जेवण न पचता तसेच पुढे ढकलले जाते. परिणामी सेवन केलेल्या अन्नातील सर्वच पोषक घटक शरीराला मिळत नाहीत.
- आपण जे काही खातो ते पचण्यासाठी सुमारे 2 तास लागतात. पोटातील पचनासाठी मदत करणारे जीवाणू, एन्झाईम्स पचनासाठी मदत करतात.
- जेवल्या जेवल्या पाणी प्यायल्यास तर अन्न जठरातून आतडय़ांपर्यंत लवकर पोहोचते. त्यामुळे त्यातील शरीरोपयोगी पोषक घटकांचे पोषण शरीराला योग्य पद्धतीने मिळत नाही.
- पचन नीट न झाल्याने गॅस आणि पित्त होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे स्थूलताही वाढते.
या प्रक्रियेत शरीरात नको असताना
इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते.
त्यामुळे मधुमेहासारख्या आजारांना
आमंत्रण मिळते.