वाळपई प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयात शनिवारीही मोठय़ा प्रमाणात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. वाळपई नगरपालिका क्षेत्रातील अजित फातर्पेकर यांच्या घराशेजारी असलेली संरक्षकभिंत कोसळल्यामुळे घरात पाणी जाऊन नुकसान होण्याचा प्रकार घडला.
याबाबतची माहिती अशी की, सत्तरी तालुक्मयात आजही दिवसभर पावसाने आक्रमक रूप धारण केल्याचे चित्र पहावयास मिळाले. यामुळे जनजीवन विस्कळीत बनले. वाळपई शहरातून ग्रामीण भागाकडे जाणारे अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याचे निदर्शनास आले. यामुळे वाहतुकीला व्यत्यय निर्माण झाला.
नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 10 मधील अजित फातर्पेकर यांच्या घराशेजारी असलेली संरक्षकभिंत शनिवारी सकाळी कोसळल्याने नुकसानी झाली. यावेळी पावसाचे पाणी घरांमध्ये घुसल्यामुळे फातर्पेकर यांच्या घरगुती सामानाची काही प्रमाणात नुकसानी झाली. हा प्रकार शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडला. नगराध्यक्षा सेहझीन शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन एकूण परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी याबाबत सत्तरी तालुक्मयाच्या मामलेदाराना माहिती देण्यात आल्यानंतर तलाठीकडून या घटनेचा पंचनामा केला आहे.
दरम्यान नगराध्यक्षा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मोठय़ा पावसाने घराशेजारी असलेली संरक्षकभिंत कोसळली व फातर्पेकर यांच्या घरामध्ये पाणी घुसल्यामुळे घरगुती सामानाची नुकसानी झाली. यासंदर्भात मामलेदार कार्यालयातर्फे पंचनामा करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या अभियंताकडून यासंदर्भाचे सर्वेक्षण करण्यात येणार असून शक्मय तेवढय़ा लवकर याठिकाणी नवीन संरक्षकभिंत बांधण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे नगराध्यक्षांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.