प्रतिनिधी/ बेळगाव
टपाल खात्यातर्फे दि. 16 ते 30 नोव्हेंबर दरम्यान स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. कोविड-19 च्या नियमांचे पालन करून या पंधरवडय़ात टपाल खात्याने विविध उपक्रम राबविले आहेत. याअंतर्गत विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.
शुक्रवारी दुपारी श्रमदानांतर्गत टपाल खात्याच्या आवारासह परिसरातील सर्व रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. टपाल खात्याच्या बेळगाव विभागाचे निरीक्षक मधुसागर यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. आरोग्याच्या दृष्टीने परिसर, घर आणि कार्यालयांमधील स्वच्छता राखणे हे आपले कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.
याप्रसंगी टपाल खात्याचे एन. एस. कट्टीमनी, सुरेश मेदार, आर. एन. खोडी, व्ही. व्ही. हदिनाळा, डी. एस. मावीनकट्टी, विद्या आर., गोमती आदी उपस्थित होते.