परिस्थिती नाजूक असतानाही आयटी क्षेत्रातील
वृत्तसंस्था/ मुंबई
सध्याला कोरोनाच्या महाभयंकर प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रात मंदीचा असर दिसतो आहे. अनेकांच्या नोकऱया जात आहेत तर काहींच्या वेतनात कपात करण्यात येत आहे. यादृष्टीने पाहता परिस्थिती नाजूक असतानाही आयटी क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) येणाऱया काळात 40 हजार जणांना भारतभरातून भरती करून घेणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली आहे.
या महामारीच्या काळात अनेक कंपन्या नुकसानीत दिवस काढत आहेत. अशा परिस्थितीतही टीसीएसने मात्र आपल्या कंपनीत नव्याने भरती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱयांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या काळातही कंपनी नव्या उमेदवारांना सामावून घेण्यासाठी उत्सुक आहे. यूएस कॅम्पस भरती प्रक्रियेतून कंपनी 2000 जणांना कंपनीत नोकरीवर घेणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव साऱयाच व्यवसायांवर जाणवत असून यातून आयटी उद्योगही बचावलेला नाही. पण असे असतानाही टीसीएसने 40 हजार कर्मचारी नव्याने भरती करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱया इच्छुक पदवीधरांना नोकरीची संधी प्राप्त होणार आहे. भारतातील विविध कॅम्पसमधून टीसीएस ही भरती प्रक्रिया येणाऱया काळात टप्याटप्याने राबवणार आहे. मागच्या वर्षी कंपनीने 40 हजार नव्या पदवीधरांना भरती करून घेतलं होतं. हाच सिलसिला यावर्षीही चालु राहणार असल्याचा खुलासा कंपनीने केला आहे.