वॉशिंग्टन :
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारी रोजी दोन दिवसांच्या भारत दौऱयावर येत आहेत. या दौऱयापूर्वीच अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानच्या सामान्य संबंधांवर जोर दिला आहे. दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली पाहिजे, परंतु पाकिस्तानला दहशतवाद्यांवर कठोर आणि निर्णायक कारवाई केल्यासच हे शक्मय होईल अशी स्पष्टोक्ती देत पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचा इशाराच दिला आहे.
पाकिस्तानने दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्यास भारत-पाक यांच्यात द्विपक्षीय वाटाघाटी आपोआपच सुरु होतील, असे मत ट्रम्प यांच्या भारत दौऱयापूर्वी एका अमेरिकन अधिकाऱयाने व्यक्त केले. या वाटाघाटी सुरू झाल्यास काश्मीरसह उर्वरित सर्व प्रश्नही निकाली निघू शकतात. तथापि, पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कठोर आणि निर्णायक कारवाई केल्यासच हे शक्मय आहे. या कारवाईविना दोन्ही देशातील कोणताही संवाद यशस्वी होऊ शकत नाही, असे ते पुढे म्हणाले.