ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची दिशाभूल करणारी आणि प्रक्षोभक माहिती शेअर करणारी 500 अकाउंट ट्विटरकडून आतापर्यंत बंद करण्यात आली आहेत.
अशा प्रकारची 1178 अकाऊंट बंद करण्याचा आदेश केंद्र सरकारने ट्विटरला दिला होता. या आदेशाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला होता. त्यानंतर ट्विटरने नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण देत 500 अकाउंट कायमस्वरूपी बंद केली.
तथापि, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी आणि प्रसारमाध्यमे यांचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्यात आलेले नाही. कारण, असे केल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होईल, असे ट्विटरने आज स्पष्ट केले.