कोरोनाबाधित ९ रुग्ण रुग्णालयातून घरी परतले
प्रतिनिधी / ठाणे :
ठाणे जिल्ह्यात कॉरोनाग्रस्ताची संख्या दिवसेंदिवस वाढ होत आहे. ७८ कोरोनाग्रस्ताची संख्या रविवारी रात्री पर्यंत ९३ वर पोहोचली आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक २८ कोरोना पॅझिटिव्ह रुग्ण नवी मुंबईमध्ये आढळल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे जिल्ह्यात शनिवारी रात्रीपर्यंत ५ हजार ९४३ प्रवाशांची निरीक्षणाखाली संचयी संख्याची नोंद आहे. ३ हजार ७८४ प्रवाशांनी १४ दिवसांच्या निरीक्षणाचा कालावधी पूर्ण केलेला आहे. ३३७ रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयातून रोगसूचक आढळलेली आहे. चिंतेची बाबा म्हणजे बुधवारी पॉझिटिव्ह रुग्नाची संख्या ४० होती, गुरुवारी ६४, शुक्रवारी ६६, शनिवारी ७८ रुग्ण होते. रविवारी रात्री पर्यंत अचानक १५ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची ९३ वर पोहोचली आहे. दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.