ऑनलाईन टीम / मुंबई :
ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील वेहळोली गावात ‘बर्ल्ड फ्लू’चा शिरकाव झाला आहे. येथील एका पोल्ट्री फार्मवर अचानक 300 कोंबडय़ांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे नमूने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तेथील अहवालात कोंबडय़ांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
नार्वेकर म्हणाले, वेहळोली गावात मागील काही दिवसांपासून 300 कोंबडय़ांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे नमुने पुण्यातल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तेथील अहवालात या कोंबडय़ांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या पोल्ट्रीच्या 1 किलोमीटर परिघातील कोंबडय़ांची कत्तल करण्यात येणार आहे. या कोंबडय़ांची संख्या जवळपास 25 हजारांच्या घरात आहे. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन खात्यानं कोंबडय़ा मारण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तसेच जिह्याच्या इतर तालुक्मयांतही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे का, याचा आढावा घेण्याचे काम जिल्हा परिषदेने सुरू केले आहे. तर, बधितक्षेत्र संसर्गमुक्त होईपर्यंत बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिघातील चिकन विपेते आणि वाहतूकदारांचे दैनंदिन कामकाज रोखण्याचे आदेश जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी दिले आहेत.