डॉक्टर-रुग्ण विसंवाद, समाजाला हानीकारक : हल्ल्याचा सर्वत्रच निषेध
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावमधील डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वास्तविक न्यायालयानेच विशेष कायदा करून कोणत्याही रुग्णाला डॉक्टरांवर हल्ला करता येणार नाही, तसा हल्ला केल्यास तो गुन्हा ठरेल, हे स्पष्ट केले आहे. तथापि, सोमवारी पुन्हा एकदा एका प्रामाणिक आणि वैद्यकीय सेवेशी नि÷ा बाळगणाऱया डॉक्टरांवर हल्ला झाला. याचे पडसाद शहरात उमटले आणि डॉक्टरांवर हल्ला करणे हे योग्य नाही, अशा प्रतिक्रिया आल्या. प्रत्येक कुटुंबीयांना आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला कोणताही आजार झाला की दुःख होतेच. रुग्णाला घेऊन डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर रुग्णाला व त्याच्या कुटुंबीयांना त्या व्यक्तीच्या प्रकृतीबाबत सर्व ती कल्पना देतात. रुग्णाला दाखल करून त्याच्यावर उपचार करताना, शस्त्रक्रिया करताना संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांकडून संमतीपत्रही लिहून घेतले जाते.
प्रामाणिक सेवा बजाविणाऱया डॉक्टरांना वेठीस धरणे चुकीचे
कोणतेच डॉक्टर आपल्याकडील रुग्णाला त्रास व्हावा, असे उपचार कधीच करत नाहीत. इतकेच नव्हे तर रुग्णाचा जीव वाचावा यासाठीच त्यांचे शर्थीचे प्रयत्न असतात. बऱयाचदा डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये वाद निर्माण होण्याचे कारण हे आर्थिक असते. बिल हातात पडल्यानंतर वादाला तेंड फुटते. गरजेपेक्षा किंवा मर्यादेबाहेर जावून जे डॉक्टर अवास्तव बिल आकारतात त्यांच्याबद्दल तक्रार करण्याचा रुग्णाला निश्चितच हक्क आहे. मात्र त्यासाठी प्रामाणिक सेवा बजाविणाऱया डॉक्टरांना वेठीस धरून चालणार नाही.
डॉ. पी. डी. जोशी हे बेळगावातील अत्यंत कुशल आणि ज्ये÷ डॉक्टर आहेत. बेळगावमधीलच नव्हे तर अनेक बाहेरील रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत. त्यांचेच सुपुत्र रोहित जोशी हे सुद्धा डॉक्टर असून त्यांनी एका रुग्णावर दि. 21 रोजी शस्त्रक्रिया केली. मात्र ऑपरेशन टेबलवरच सदर रुग्णाला कर्करोग झाला असून तो सर्वत्र पसरत आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी संबंधित नातेवाईकांना कल्पना देऊन कर्करोगावरील उपचारासाठी दुसऱया हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल, असे सुचविले. रुग्णाची आर्थिक परिस्थिती उत्तम नसल्याने त्याला सिव्हिलमध्ये दाखल केले गेले. मात्र रुग्णाची प्रकृती सुधारत नाही या कारणास्तव डॉ. जोशी यांच्या दवाखान्यावर हल्ला झाला. डॉ. पी. डी. जोशी व डॉ. रोहित जोशी हे बेळगावातील मान्यताप्राप्त प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्यांच्याबद्दल रुग्णांमध्ये आदर आहे. त्यामुळे या हल्ल्याचा सर्वत्रच निषेध करण्यात आला. रुग्णाच्या नातेवाईकांच्या किंवा परिचितांच्या भावनांचा सर्वांनीच आदर करायला हवा. रुग्णाच्या शरीरातील गुंतागुंत ही केवळ डॉक्टरांनाच समजू शकते. त्यामुळे त्यांनी योग्य उपचार केले नाहीत, असे म्हणताना ते सिद्ध करण्याची जबाबदारी परिचितांवर येवू शकते. त्यासाठी आपला अभ्यासही हवा. रुग्णांबद्दल पूर्णतः सहानुभुती बाळगूनसुद्धा रुग्णांनी डॉक्टरांवर नव्हे तर कोणीच कोणावरती हल्ले करणे, मोडतोड करणे हे योग्य नाही.
डॉक्टर हा सुद्धा माणूस आहे. त्यांच्याकडून चुका होणारच नाहीत, असा दावा खुद्द ते सुद्धा करत नाहीत आणि समाजही तसे मानत नाही. परंतु निष्कारण एखाद्याला लक्ष्य करणे चुकीचेच ठरते. रुग्ण बराच व्हायला हवा त्यासाठी अनेक घटक मदतीला तयार आहेत. डॉक्टरांवरील हल्ल्यामुळे कदाचित पुढे रुग्णांना हात लावण्यास टाळाटाळ करतील. समाज स्वास्थ्याच्या दृष्टिने हे परवडणारे नाही. डॉक्टर -रुग्ण यांच्यातील समन्वय होईल तेंव्हाच दोन्ही घटकांसाठी ते हितावह ठरेल.
फक्त रुग्ण बरा होईल एवढे आश्वासन आम्हाला हवे
ऑपरेशनवेळी आम्ही कोणी नव्हतो, हे खरे आहे. परंतु रुग्णाचे आई-वडिल आमच्याकडे मदत मागण्यासाठी आले. त्यांची परिस्थिती पाहता आम्ही त्यांना मदत करत आहोत. डॉक्टरांबद्दल आमची तक्रार नाही. कोणीही डॉक्टरांना धक्काबुकी केली नाही. फक्त रुग्ण बरा होईल एवढे आश्वासन आम्हाला हवे आहे.
-सिद्राय मेत्री-दलित संघर्ष समिती
रुग्णांनी डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवणे आवश्यक
रुग्णाची परिस्थिती लक्षात घेऊन त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून रविवार असूनही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मी स्वतः रुग्णाला भूल दिली आहे. काही करा, माझ्यावर उपचार करा, असे सांगून रुग्ण डॉक्टरांच्या पाया पडला आहे. 3 ते 4 बाटल्या रक्त लागेल, रुग्णाची अवस्था गंभीर आहे, हे त्याच्या पालकांनाही सांगण्यात आले होते. ऑपरेशन करताना कर्करोग असल्याचे लक्षात येताच पुन्हा त्यांना समजावून खर्च परवडणारा नसल्यास एखाद्या योजनेमध्ये समावेश करता येईल. प्रथम सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घ्या, असे सांगून तेथे दाखल केले गेले. त्यावेळी कोणत्याही संघटनेचे कार्यकर्ते रुग्णासमवेत नव्हते. सोमवारी दवाखान्यात आलेले लोक वेगळेच होते. 50 वर्षे डॉ. पी. डी. जोशी यांनी रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांचाच वारसा डॉ. रोहित पुढे चालवत आहेत. रुग्णांनी डॉक्टरांवरती पूर्ण विश्वास ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा ही बाब रुग्णांसाठीच त्रासदायक होऊ शकते.
-डॉ. सुचित्रा लाटकर-भूलतज्ञ
आमचा डॉक्टरांना पूर्ण पाठिंबा
1985 साली अमृत व प्रभाकर भाकोजी यांचे वडील रघुनाथ भाकोजी यांना पोटदुखीमुळे डॉ. पी. डी. जोशींकडे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सुद्धा ऑपरेशन टेबलावर त्यांना कॅन्सर असल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी संपूर्ण परिस्थिती समजावून पोटावर टाके घालून पुन्हा परत पाठविले. 1997 साली माझे अल्सरचे ऑपरेशन डॉ. पी. डी. जोशी यांनी केले आहे. तर हर्नियाचे ऑपरेशन डॉ. रोहित जोशी यांनी केले. माझ्या संपर्कात येणाऱया रुग्णांना मी शक्य तो पी. डी. जोशींना दाखवा, असा सल्ला देतो. दोघेही प्रामाणिक आणि रुग्णसेवेला प्राधान्य देणारे डॉक्टर आहेत. व्यवसाय म्हणून ते हा पेशा करत नाहीत. यामुळे आमचा डॉक्टरांना पूर्ण पाठिंबा आहे.
-नेताजी जाधव-माजी नगरसेवक
धक्काबुकीचा आयएमएकडून निषेध
डॉ. रोहित जोशी यांना झालेल्या धक्काबुकीचा आयएमए निषेध करते. सर्व डॉक्टर रोहित जोशी यांच्या समवेत आहेत. पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी आयएमएतर्फे पोलीस स्टेशनला जावून संरक्षणाची मागणी केली आहे. आम्हाला न्याय हवा आहे.
-डॉ. अनिल पाटील-अध्यक्ष आयएमए