प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयातील पैकुळ गावातील पूल कोसळल्यामुळे जलवाहिनीची फुटल्याने पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता. सरकार पातळीवर याबाबत वेगवेगळय़ा स्तरावर प्रयत्न केल्यानंतर तब्बल दीड महिन्याने गावातील पाणीपुरवठा पूर्वपदावर आलेला आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
23 जुलै रोजी मोठय़ा प्रमाणात पाऊस पडल्यामुळे रगाडा नदीला पाणी आल्याने पैकुळ पुलावरून घातलेली जलवाहिनी फुटली व पैकुळ गावाला पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागातर्फे विशेष प्राधान्य देऊन रगाडा नदीच्या खालून एचडी जलवाहिनी टाकलेली आहे. यासंदर्भाचे काम नुकतेच पूर्ण झाले व गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सदर गावातील पिण्याच्या पाण्याची सुविधा पूर्वपदावर आली.
सत्तरी तालुक्मयात प्रथमच एचडी ही जलवाहिनी घातलेली आहे. त्याचप्रमाणे नदीच्या खालून जलवाहिनी टाकण्याचा सत्तरी तालुक्मयातील पहिलाच प्रयत्न आहे. अवघ्या पंधरा दिवसांत काम पूर्ण होऊन गावाला पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण झालेली आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर, खात्याचे अधीक्षक अभियंता पार्सेकर यांनी सहकार्य केल्याचे वाळपई पाणीपुरवठा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता सोमा नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले. दरम्यान स्थानिक पंचसदस्य अस्मिता मेळेकर यांनी सरकारचे व आरोग्यमंत्री विश्वजित राणे आभार व्यक्त केले.