मोर्ले, घोटगेवाडी, घोटगे गावातील शेतकरी संकटात
प्रतिनिधी / दोडामार्ग:
शेतकऱयांना कृषी पंपासाठी वीज जोडणी देण्याचे दर पंधरा दिवसांनी आश्वासन वीज वितरण विभाग देत आहे. वीज जोडणीसाठी बहुतांशी काम पूर्ण झाले असले तरी प्रत्यक्षात वीज जोडणी झाली नाही. परिणामी मोर्ले, घोटगेवाडी, घोटगे आदी गावातील जवळपास दहा शेतकरी संकटात सापडले आहेत. यातील काही शेतकऱयांनी अधिकाऱयांना वारंवार विचारणा केली. मात्र, आज-उद्या जोडू, असे केवळ आश्वासन मिळत आहे.
या महत्वाच्याप्रश्नी स्थानिक आमदार, खासदार यांनी संबंधित अधिकाऱयांना सूचना कराव्यात, अशी मागणी होत आहे. एकतर कष्टाने शेती करायची आणि शासनाकडे शक्य असलेल्या कामासाठी हेलपाटे किती मारायचे? असा सवाल शेतकरी विचारत आहेत.