-शहरातील‘आशां’ना मिळाले साहित्य -आयुक्तांनी घेतली दखल
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हय़ात कोरोनाचा घर टू घर सर्वे करणाऱया आशा, गटप्रर्वतक महिलांना अखेर सुरक्षिततेची साधने प्रशासनाने उपलब्ध करुन दिली आहेत. प्रत्येकी एक मास्क, 100 मिली सॅनिटायझर, सनकोट, कॅप असा संच आशा कर्मचाऱयांकडे सुफूर्द केला. ‘तरुण भारत’ सोशल मिडिया वृत्ताची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ही साहित्य तातडीने उपलब्ध करुन दिले. ना मास्क ना हात धुण्यासाठी सॅनिटारझर, जीव धोक्यता घालून ‘आशा’ काम करत आहेत. कोल्हापूरसारख्या प्रगत जिल्हय़ात साडीच्या पदराचा मास्क म्हणून वापरण्याची वेळ आशांवर आली आहे. असे वृत्त प्रसिद्ध केले होते. साहित्य मिळाल्याने आता पदर खोचून राष्ट्रीय कर्तव्य बजावू असे संघटनेच्या अध्यक्षा नेत्रदीपा पाटील यांनी सांगितले.
कोरोना विरूद्धची आशांची लढाई प्रशासन कधी गांभिर्याने घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य मिशन योजनेंतर्गत येणाऱया सर्व आरोग्यविषयक योजना आशा कर्मचाऱयांमार्फत सोपवल्या जात आहेत. सध्या कोरोना विषयी जनजागृती आणि संशयित रुग्णांची नोंदणी करण्याचे काम आशांवर सोपवण्यात आली आहे. यासाठी त्यांना वेगळे मानधन सोडाच आवश्यक आरोग्य सुविधा आणि साधनसामुग्री पुरवलेली नाही. मास्क, सॅनिटायझर, यासह कोणत्याच सुविधा त्यांना दिलेल्या नाहीत. जिल्हय़ात 3 हजार आशा महिला कोरोनाच्या सर्व्हेमध्ये गुंतल्या आहेत.
शहरातील भक्तीपूजा नगरमध्ये 101 आशा कर्मचाऱयांनी सर्व्हेक्षण सुरु केले आहे. त्यांना सुरक्षीत साधणे नसल्याने जीव धोक्यात घालून काम करत होत्या. आता सुरक्षीत साधने मिळाल्याने सर्वेक्षणाला वेग आला आहे.
जिल्हय़ातही तातडीने पुरवठा करावा
आम्ही राष्ट्रीय काम म्हणून काम करत आहोत आम्हाला किमान समाजिक सुरक्षातरी मिळाल्या पाहिजेत. सध्या मिळालेली साधने तुटपुंजी आहेत. कोल्हापूर शहरातील प्रश्न मार्गी लागला आहे. आता जिल्हाधिकाऱयांनी पुढाकार घेवून जिल्हय़ातही तातडीन्sढ साहित्या द्यावे – नेत्रदीपा पाटील, जिल्हाध्यक्ष आशा संघटना