नवी दिल्ली
भारतीय अर्थव्यवस्थेला महामारीपासून वाचवायचे असेल तर त्याबाबत ठोस अशा उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे ब्रोकरेज फर्म बार्कलेज यांनी म्हटले आहे. स्थानिक स्तरावर राज्यांमाध्ये लॉकडाऊन जर का जूनपर्यंत असेच चालू राहिले तर 2.8 लाख कोटी रुपयांचा आर्थिक फटका देशाला बसू शकतो, असा इशारा बार्कलेज यांनी दिला आहे.
जगासह भारतासाठी चिंता वाढवणाऱया कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवणे भारताला सध्या अत्यावश्यक झाले आहे. रुग्णांची वाढती संख्या व मृतांची संख्याही वाढती असल्याने कोरोनाबाबत सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसते आहे. अशाच पद्धतीने जर का लॉकडाऊन पुढे वाढवला गेल्यास देशाची आर्थिक स्थिती आणखी बिकट होईल. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी देशव्यापी संपूर्ण लॉकडाऊनमुळे मागणी व रोजगारात मोठी घट दर्शवली गेली होती. ऑगस्टपर्यंत जर का अशीच स्थिती राहिली तर विकास दर चांगलाच घटू शकतो.