मनीषा सुभेदार / बेळगाव
कोरोनाचे संकट टळणार आणि अच्छे दिन येणार, यावर पूर्ण विश्वास ठेवा. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करा. कोरोनापेक्षाही संकट वाढवतो तो तुमचा ताण! त्यामुळे ताण नियंत्रित करा, मन स्थीर ठेवा, मन आणि हृदय सुरक्षित राहण्यासाठी योगासन करा, क्यायाम करा, कोणत्याही परिस्थितीत खचून जावून घाबरुन जावू नका, ताण कमी झाला तर तुमचे हृदय सुरक्षित राहणार आहे. परिणामी कोरोनाला हृदयावर आक्रमण करण्यापासून तुम्ही रोखू शकता…..
या महत्त्वाच्या टीप्स दिल्या आहेत हृदयरोगतज्ञ डॉ. संजय पोरवाल यांनी. 29 सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक हृदयदिन म्हणून आचरणात आणला जातो. यंदाच्या या दिवसाला अधिक महत्त्व आहे. त्याचे कारण म्हणजे कोरोनाकाळात हृदयावर ताण येवून होणारे मृत्यू. म्हणूनच यंदाच्या या जागतिक हृदयदिनाचे घोषवाक्मय आहे ‘युज हार्ट टू बीट हार्ट’ हे आहे. म्हणजेच हृदयविकार रोखण्यास हृदयाचा वापर करा. याच अनुषंगाने डॉक्टर संजय पोरवाल यांच्याशी संवाद साधला.
-आपल्या प्रत्येकासाठी हृदय किती महत्त्वाचे आहे?
:हृदय आपल्या जीवनाचा आधार आहे. हृदय मानसिकदृष्टय़ा आणि शारीरिकदृष्टय़ा स्थिर आहे. माणूस हृदयाने विचार करतो. हृदय जर बंद झाले तर जीवनच संपते. म्हणूनच हृदयाचे आरोग्य हे आरोग्याच्या केंद्रस्थानी आहे. हृदय निरोगी तर आपण निरोगी. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या हृदयाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. हृदयाशिवाय जीवन ही कल्पनाच अशक्मय आहे. यावरूनच हृदयाचे महत्त्व आपल्याला लक्षात येते.
:इतका महत्त्वाचा अवयव असणाऱया हृदयाची काळजी कशी घ्यावी?
:स्वस्थ जीवनासाठी स्वास्थ्यशुद्ध शरीर आणि मन हवे. यासाठी व्यायाम हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. आठवडय़ाला किमान 150 मिनिटे चालणे आवश्यक आहे. दररोज 30 मिनिटांचा व्यायाम हा हृदयासाठी पोषक ठरू शकतो. चालणे हे गप्पा मारत, आरामात नसावे. एका श्वासात आपले एक वाक्मय बोलून पूर्ण होणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला चालायला हवे. त्याचबरोबर योगासने आणि मन नियंत्रित राहील, असे व्यायाम करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पिझा, बर्गर असे मैदायुक्त पदार्थ, बेकरीचे पदार्थ खाण्यावर मर्यादा हवी.
:हृदयविकाराचे प्रमाण तरुणाईमध्येही वाढते आहे, याचे कारण काय?
: हे वास्तव आहे आणि ते दु:खदायक आहे. वृत्तपत्रातील निधनवार्ता हे याचे जिवंत उदाहरण आहे. याचे कारण म्हणजे तरुणाईमध्ये वाढलेली ‘इझी गो लकी’ ही प्रवृत्ती. व्यायामाचा अभाव, बैठे काम, नाष्टा, जेवण, रात्रीचे भोजन आणि झोप यांच्या विस्कळीत झालेल्या वेळा, ही तर कारणे आहेतच. परंतु व्यसनाधीनता हे तरुणाईमध्ये वाढलेल्या हृदयविकाराचे मुख्य कारण आहे.
आज केवळ तंबाखू, गुटखा नव्हे तर दारू, गांजा, कोकेन हे अमलीपदार्थ तरुणाई सहज सेवन करत आहे. ही फार चिंताजनक बाब आहे. हे सर्व घटक हृदयासाठी घातक आहेत. सिगारेटचा एक झुरकासुद्धा हृदयाची नाडी लहान होण्यासाठी कारणीभूत ठरतो. त्यामुळे हृदयावर ताण येतो. जो हृदयाला सहन होत नाही. म्हणून तरुणाईमध्ये हृदयविकार वाढले आहेत. त्याचबरोबर अनेकांना आज काम नाही, नोकरी नाही, त्यामुळे मन तणावाखाली आहे. मन आणि हृदय संलग्न असल्याने मनाला त्रास झाला तर हृदयालाही त्रास होतो. त्यामुळे ताण नियंत्रित करण्यासाठी सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
:हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही लक्षणे आढळतात का? आपले शरीर तसे संकेत देते का?
: होय. जर पूर्वी भरभर चालणाऱया व्यक्तीला अचानक दम लागला, थकवा जाणवला तर आपण वेळीच सावध व्हायला हवे. एखादा खेळाडू अनेक धावा काढत असेल आणि अचानक केवळ शरीर थकल्यामुळे तो दोन धावांवर रनआऊट होत असेल तर हा शरीराने दिलेला संकेत आहे. म्हणजेच पूर्वी जी कामे आपण सहजगत्या करत होतो, तीच आज त्रासदायक होत असतील तर आपल्याला डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. डॉक्टरांकडे जाण्याबाबत दुर्लक्ष न करणे हे सर्वाधिक महत्त्वाचे.
:ऍन्जिओग्राफी, ऍन्जिओप्लास्टी व बायपास म्हणजे काय?
:हृदयाला त्याच्या गरजेइतका रक्तपुरवठा होत नाही, याचाच अर्थ हृदयाला रक्तपुरवठा करणाऱया वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झालेला आहे. हा अडथळा कितपत आहे हे ऍन्जिओग्राफीमुळे कळते. पायातून किंवा जांघेतून दोन मि.मी.ची टय़ुब औषध घालून हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये सोडण्यात येते. त्यामुळे ब्लॉकेजीस कळतात. या प्रक्रियेत रुग्णाला दोन तासातसुद्धा घरी जाता येते. ऍन्जिओप्लास्टीमध्ये आपण हृदयाला स्टेंट बसवितो आणि रुग्ण चार दिवसांत घरी जावू शकतो. बायपास म्हणजे हृदयाला जेंव्हा थेट रक्तपुरवठा होत नाही तेंव्हा पर्यायी मार्गाने हृदयाला रक्तपुरवठा करणे होय. यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक असून रुग्णाला पूर्णतः बरे होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागतो.
:झटका आल्यास किती वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचणे आवश्यक आहे?
:30 मिनिटांत रुग्णाने हॉस्पिटलमध्ये पोहोचणे आवश्यक आहे. याला वैद्यकीय परिभाषेत ‘गोल्डन टाईम’ म्हटले जाते. त्याचा उपयोगही होतो. परंतु किमान 1 तासात रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणणे आवश्यक आहे.
:कोरोनाकाळात हृदयाची काळजी कशी घ्यावी?
:कोरोनाकाळात सरकारच्या नियमांचे पालन करणे, एका अर्थाने आपली काळजी आपणच घेणे, हे सर्वात महत्त्वाचे. मास्क घाला तो योग्य पद्धतीने घाला, सॅनिटायझर वापरा, गर्दी टाळा. आज बाजारपेठेत गर्दी दिसते. बरेच लोक मास्क घालत नाहीत. जे घालतात ते चुकीच्या पद्धतीने घालतात. म्हणून मास्क योग्य पद्धतीने वापरा, उत्तम आहार घ्या. ताण टाळण्यासाठी मन स्वस्थ असणे आणि त्यासाठी योगासने करणे आवश्यक आहे. ज्याचे मन शांत आहे तो अनेक आजारांपासून दूर राहतो. ‘ये भी दिन जायेंगे और अच्छे दिन आयेंगे’ यावर पूर्ण विश्वास ठेवा.
ताण नियंत्रित करण्याचे तंत्र आपण आत्मसात केलेच पाहिजे
कोरोनाकाळात हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. याचे कारण कोरोना हृदयावरसुद्धा आघात करतो. कोरोनाबाधित व्यक्तीला हृदयात ब्लॉकेजीस नसतात. तरीही हृदयावर ताण येवून त्याचा मृत्यू होतो. याचे कारण त्याच्या स्नायूंवर कोरोनाचे आक्रमण होते आणि हृदयाला रक्तपुरवठा कमी होऊ लागतो. म्हणूनच ताण दूर ठेवला पाहिजे. अर्थात आपल्या जन्मासोबतच ताण आपल्यासोबत आलेला असतो. परंतु तो नियंत्रित करण्याचे तंत्र आपण आत्मसात केलेच पाहिजे. घाबरल्याने ताण वाढू शकतो, हे कोरोनाबाधितांनी लक्षात ठेवायला हवे.
हृदय जपा…
:हृदय हा जीवनाचा आधार
:हृदय बंद तर जीवन संपले
:मन आणि हृदय संलग्न म्हणून मन स्थीर हवेत
: कोणत्याही स्वरुपाचे व्यसन हृदयास घातक
: जंकफूड, चर्बीयुक्त आहार, मीठ-साखरेचे अतिप्रमाण घातक
: कोरोनाचा ताण हृदयावर आणू देऊ नका