शाहूपुरी
जिह्यात थंडी वाढत अशून साताऱयातील किमान तापमानात 3 अंशाचा उतार आला. त्यामुळे साताऱयातील तापमान 18 अंशाच्या खाली आले आहे. परिणामी थंडीत वाढ झाली आहे. तर ग्रामीण भागही गारठला आहे. जिह्यात नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरुवात झाली. दिवाळीत तर किमान तापमान 15 अंशापर्यंत खाली आले होते. त्यामुळे थंडीचा कडाका पडला. मात्र, दिवाळीनंतर काही दिवस थंडी गायब झाली होती. मात्र, दोनच दिवसांत पुन्हा
तापमानात वाढ झाली. असे असले तरी चार दिवसांपासून तापमान कमी-कमी होत चालले आहे.