30 रोजी निकाल : गावोगावी कोण निवडून येणार याचीच चर्चा: उमेदवार-समर्थक गुंतले मतदारांच्या आकडेवारीत
वार्ताहर / किणये
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुक्मयात मंगळवार दि. 22 रोजी मतदान झाले. उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद झाले आता उत्सुकता लागली आहे ती निकालाची. गावागावात कोपऱया-कोपऱयात एकच चर्चा रंगू लागली आहे तुमच्याकडे कोण निवडून येणार. तसेच उमेदवार व त्यांचे समर्थक मतदानाच्या आकडेवारीमध्ये गुंतलेले आहेत.
तालुक्मयात मंगळवारी अत्यंत चुरशीने मतदान झाले. कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमावलीचे पालन करत मतदान झाले.एक-दोन गावे वगळता बहुतांशी गावांमध्ये मतदार केंद्रामध्ये अगदी शांततेत मतदान झाले.
प्रचारासाठी मेहनत घेतलेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी मंगळवारी सुटकेचा नि:श्वास सोडला. निवडणुकीच्या दुसऱयाच दिवशी म्हणजे बुधवारपासून श्रमपरिहार म्हणून अनेकांनी ओल्या पाटर्य़ा रंगवल्या होत्या. मात्र आचारसंहिता असल्याने या पाटर्य़ा गुपित व निवांत ठिकाणी करण्यात आल्याचे सांगनण्यात आले.
उमेदवारासहित त्याचे समर्थक या उमेदवाराला किती मते पडली असावीत याची गोळाबेरीज करू लागले आहेत. तसेच मंगळवारी रात्रीपासूनच या आकडेवारीमध्ये काहीजण दंग झाले आहेत. बुधवारी दिवसभर प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये केवळ तुमच्या गावात कोण लीड होणार किंवा कोण निवडून येणार याचीच चर्चा चालू होती.
दि 7 डिसेंबर रोजी पासून अर्ज भरणी प्रक्रियेला सुरुवात झाली. तसेच दि. 11 रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. त्यानंतर 14 रोजी अर्ज माघारी झाल्यानंतर मात्र निवडणूक प्रचाराला जोर आला होता.
तालुक्मयाच्या सर्वच भागात महाराष्ट्र एकीकरण समिती, भाजपा व काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. मात्र गाव पातळीवर राजकारण असल्यामुळे बहुतांशी गावांमध्ये ग्राम विकास आघाडी किंवा अपक्ष या माध्यमातूनच अधिक प्रमाणात निवडणूक झाली आहे.
शासनाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी
तालुक्मयाच्या बहुतांशी गावांमध्य्ाs 80 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. तर तालुक्मयाच्या पश्चिम भागात 86 टक्के मतदान झाले आहे. मंगळवारी ग्रामपंचायत मतदानासाठी अनेकांनी आपापल्या वॉर्डातील मतदारांना मतदान करण्यासाठी विविध प्रकारच्या वाहनांचा उपयोग केला होता. तसेच दिव्यांग व वयोवृद्ध यांच्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्थाही करण्यात आली
होती. मतदान केंद्रावर येणाऱया प्रत्येक मतदाराला प्रथम
सॅनिटायझर देऊन त्यांची थर्मल स्कॅनिंगद्वारे तपासणी करण्यात येत होती. मतदान करते वेळी प्रत्येकाने मास्कचा वापर केला होता. सामाजिक अंतराचे भान ठेवण्याच्या सूचनाही करण्यात येत होत्या. त्याचे पालन ही ग्रामीण भागातील जनतेने अगदी काटेकोरपणे केल्याचे निदर्शनास
आले.
सायंकाळी 6 पर्यंत मतदान
बहुतांशी ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रावर सायंकाळी पाच पर्यंत मतदान झाले. तर काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्यामुळे त्यांना नंबर देऊन सायंकाळी उशिरा सहा वाजेपर्यंत काही मतदान केंद्रांवर मतदान झाल्याचे सांगण्यात आले.
मतदान झाल्यानंतर गावागावातील पंच मंडळी, नेतेमंडळी, उमेदवारांचे समर्थक व कार्यकर्ते यांची आकडेवारी सुरू झाली की, आपल्याला किती मते पडली असणार आणि या रिंगणात कोण विजय होईल याचीच चर्चा सुरू झाली होती. येणारे दोन-चार दिवस तरी उमेदवारांबद्दलच चर्चा होणार असल्याने आता साऱयांचेच लक्ष दि 30 रोजीच्या निकालाकडे लागले आहे.