सिसील रॉड्रिगीस यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी / पणजी
ताळगांव येथे मोठय़ा प्रमाणात शेतकरी असले तरी त्यांच्यावर मोठय़ा प्रमाणात अन्याय होत आहे. विकास कामाच्या नावाखाली शेतकऱयांची जमीन बळजबळीने ताब्यात घेतली जाते तसे नाही झाले तर इतर नाहक त्रास करुन त्यांना छळले झाते असे मत सिसील रॉड्रिगीस यांनी व्यक्त केले.
ताळगांव-करझाळे सिमेजवळ असलेल्या समर्थ रेसिडंसीचे सांडपाणी थेत शेतकरी विनोद फर्नांडिस यांच्या शेतात जाऊन मिसळते. याबाबत त्याने अनेकवेळा पंचायतकडे तक्रार देखील केली होती परंतु यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यासंदर्भात आम्ही आरोग्य खात्याला, कृषी खात्याला, ताळगांव पंचायत तसेच उत्तर गोवा नगर नियोजन खात्याला निवेदन दिले आहे. परंतु त्यांच्याकडून देखील चांगला प्रतिसाद नाही मिळाला असे रॉड्रिगीस यांनी पुढे सांगितले.
सांडपाणीमुळे शेताचे मोठे नुकसानः शेतकरी विनोद फर्नांडिस
समर्थ रेसिडंसिचे पाणी आमच्या शेतात येते हे आताची समस्या नसून अनेक वर्षाची समस्या आहे. सुमारे 2009 सालापासून ही समस्या उद्भवली आहे. या सांडपाणीमुळे माझ्या शेताचे मोठे नुकसान होत आहे. दरवर्षी आम्ही या समस्येबद्दल पंचायतकडे तक्रार करतो, परंतु तिथे आम्हा कोणही चांगला प्रतिसाद देत नाही. कुणालाही माझ्या या तक्रारीचे काहीच पडलेले नाही. उलट परत परत तक्रार करण्यात येते म्हणून आम्हाला धमक्याही देण्यात आल्या आहेत. असे शेतकरी विनोद फर्नांडिस यांनी यावेळी सांगितले.