दोडामार्ग – वार्ताहर-
तिलारी नदी काठावर संरक्षक भिंत बांधण्यात यावी याबाबतची मागणी शिवसेनेचे कोनाळ विभाग प्रमुख संतोष मोर्ये यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली आहे. या संदर्भातील एक निवेदनही मोर्ये यांनी खासदार राऊत यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले की, पावसाळ्यात तिलारी नदीला पूर येतो तसेच धरणाच्या अतिरिक्त पाण्यामुळे नदीकाठावरील घरे व शेती बागायतीची प्रचंड नुकसान होते. सदर नुकसान मागील तीन ते चार वर्षापासून सतत होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यावर कायमस्वरूपी पर्याय म्हणून नदीच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत बांधण्याची कार्यवाही पाटबंधारे प्रकल्प विभाग तिलारी यांनी करावी अशी मागणी मोर्ये यांनी खासदार राऊत यांच्याकडे केली आहे.