पती-पत्नीचे हातपाय बांधून सोने-चांदीचे दागिने, रोकड लंपास ः घटनेने टिळकवाडी परिसरात खळबळ ः पोलीस तपास सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
घराच्या खिडकीचे गज कापून दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून घरातील व्यक्तींचे हात-पाय बांधून त्यांच्याकडील चावी घेऊन सोने, चांदी आणि रोकड लांबविल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून केवळ सुदैव म्हणूनच त्या दरोडेखोरांनी कोणालाही जखमी केले नाही. या प्रकरणी उद्यमबाग पोलीस स्थानकात फिर्याद दाखल झाली असून पोलीस आता या दरोडेखोरांचा तपासाच्या कामाला लागले आहेत.
दरोडेखोरांनी 40 गॅम सोने, रोख 12 हजार रुपये, एक मोबाईल आणि चांदीचे ताट- वाटय़ा असा एकूण 1 लाख 65 हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविला आहे. दरोडेखोरांच्या टोळीत सात जण होते.
तिसऱया रेल्वेगेटजवळील राणाप्रताप रोडवरील अभिजित सामंत यांच्या घरात ही घटना घडली आहे. दरोडेखोरांनी खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. त्यावेळी अभिजित सामंत आणि त्यांच्या पत्नीला जाग आली. त्यामुळे ते उठले. मात्र, दरोडेखोरांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखविला. तसेच कपाटाची चावी द्या, नाहीतर पहा, असे म्हणून त्यांच्यावर दबाव घातला. त्यामुळे नाईलाजास्तव अभिजित यांनी चाव्या दिल्या. चाव्या घेऊन दरोडेखोरांनी पती-पत्नीचे हात-पाय बांधून त्यांना एका खोलीत कोंडून घातले.
एका दरोडेखोराबरोबर झाली झटापट
दरोडेखोरांनी त्यांच्या जवळील मोबाईलही काढून घेतला. त्यामुळे त्यांना काहीच हालचाल करता आली नाही. त्यांनी सोन्याची अंगठी, कर्णफुले, महिलेच्या गळय़ातील सोन्याचे गंठण, चांदीच्या वाटय़ा आणि देव्हाऱयावरील देव घेतले. यावेळी अभिजित यांनी कशीबशी आपली सुटका करून घेतली. खोलीचा दरवाजा उघडून ते बाहेर पडले. मात्र चोरटे शस्त्रs दाखवत घरातून बाहेर पडू लागले. यावेळी एका दरोडेखोराबरोबर अभिजित यांची झटापटही झाली. मात्र सात जण असल्यामुळे अभिजित यांचे काहीच चालले नाही.
या घटनेनंतर आजुबाजूच्या लोकांना त्यांनी जागे केले. त्यानंतर पाहणी केली असता 40 गॅम सोने, रोख 12 हजार रुपये, एक मोबाईल आणि चांदीचे ताट- वाटय़ा असा एकूण 1 लाख 65 हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविण्यात दरोडेखोर यशस्वी ठरले. या घटनेची माहिती उद्यमबाग पोलिसांना देण्यात आली. पहाटेच पोलीस घटनास्थळी श्वान पथकासह दाखल झाले. काही अंतरावर श्वान घुटमळल्यामुळे दरोडेखोरांनी पलायन करण्यास वाहनाचा वापर केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
पोलिसांसमोर आव्हान
बऱयाच दिवसांनंतर अशा प्रकारे दरोडा पडला आहे. सात जणांच्या या टोळक्मयाने जो दरोडा घातला तो अत्यंत भीतीदायक आहे. यापूर्वी झाडशहापूर येथे दिवसाढवळय़ा घरे फोडणाऱया कुख्यात चोरटय़ांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता रात्रीच्या वेळी अशा प्रकारे दरोडा घातल्यामुळे टिळकवाडी व उद्यमबाग परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांसमोरही हे मोठे आव्हान असून आता पोलिसांना गस्त घालावी लागणार आहे.