म्हैसूर/प्रतिनिधी
राज्यत जिल्हाभरातील पदवी महाविद्यालये १७ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी घेणे आणि अवघ्या तीन दिवसांत अहवाल देणे शक्य नाही. असे आरोग्य विभागाने म्हंटले आहे.
१५ हजारापेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थी विविध पदवी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत . वर्ग सुरू होण्यास अवघ्या तीन दिवस शिल्लक राहिल्याने बरेच विद्यार्थी जे घरी परतले होते ते आता शहरात परतले आहेत.
राज्य सरकारने वर्गात प्रवेश घेण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांची कोविड चाचणी घेणे बंधनकारक केले असताना आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांची इतक्या वेगाने चाचणी घेणे कठीण आहे. उत्सव चालू असून मोठ्या सार्वजनिक ठिकाणी पथके नियुक्त केल्यामुळे निर्धारित वेळेत सर्व विद्यार्थ्यांची चाचणी घेणे कठीण आहे.
व्यवस्थापनाच्या विनंतीवरून आम्ही महाविद्यालयांमध्ये चाचणी घेण्यासाठी पथक तैनात करीत आहोत, असे आरोग्य विभागाच्या कर्मचार्याने सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी टी. अमरनाथ यांनी सांगितले की ते अंतिम वर्षाच्या युजी आणि पीजी विद्यार्थ्यांची प्रथम चाचणी घेत आहेत. महाविद्यालयांना चाचण्या करण्यासाठी मोबाइल पथक पाठवित आहोत. उत्सवांच्या दरम्यान, सर्व विद्यार्थ्यांची चाचणी घेणे शक्य नाही. यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना चाचणी करण्याची घाई असेल त्यांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राला भेट देऊ शकतात, असे ते म्हणाले.