मंत्री मायकल लोबो यांची माहिती
प्रतिनिधी / म्हापसा
शिवोलीतून कामुर्ली येथे ठेवण्यात आलेली तरंगती जेटी कामुर्ली येथे घालण्याचा घाट सरकारने घातला आहे, असे समजून कामुर्लीवासियांनी जेटीला विरोध दशर्विला. मात्र सरकारचा तसा काहीच उद्देश नसून शापोरा नदीच्या पात्रात ग्रामस्थांना तरंगती जेटीस विरोध असल्यास ती जेटी पुन्हा, असे ठोस अश्वासन किरण कांदोळकर यांनी ग्रामस्थांना दिले.
कोलवाळच्या जिल्हा पंचायत सदस्या कविता किरण कांदोळकर यांच्यासह कामुर्ली सरपंच इशान नाईक गावकर, उपसरंपच अभय पेडणेकर, पंच तुषार नाईक, थिवी मंडळ अध्यक्ष रांजेद्र जोशी, बापू नाईक यांनी मंत्री मायकर लोबो यांची भेट घेऊन कामुर्ली जेटीला विरोध असल्याचे निवेदन सादर केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी सवांद झाला.
मंत्री लोबो यावेळी म्हणाले, कामुर्ली जेटी घालण्याचा सरकारचा उद्देश नाही. निवा तशी निविदाही काढण्यात आली नाही. ती कामुर्ली येथे बांधून ठेवली आहे. ती पणजीत आणली जाईल. ही जेटी शिवोली पुलाखाली पर्यटकांसाठी उपयोगात आणण्याचा विचार सरकारचा होता. मात्र तेथील मासेविक्रेते मुख्यमंत्री व आपल्याकडे लेखी निवेदन दिले. गावातील लोकांनी आमदारांची भेट घेतली. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात आल्याची माहिती मंत्री लोबो यांनी दिली.
वॉटर व्हेस पुन्हा गोव्यात यायला हवी, म्हणून आम्ही तरंगती जेटी घातली आहे. जेटी कॅप्टन ऑप पोर्ट नजीक, जुने गोवे, मिरामार, कांपाल, सिकेरी येथे घालण्यात येणार आहे. आता लॉकडाऊन आहे, वॉटर व्हे दुसरी रस्त्याची वट आहे. आता निवडणूक होणार आहे. लोकांना विश्वासात घेऊन पुढे जाणे आवश्यक आहे, असे लाबो म्हणाले. दीड वर्षापूर्वी कोरोना नव्हता तेव्हा राज्यात सर्वत्र गर्दी होत होती. कळंगुट येथे जाण्यास दोन तास लागत होते, हे राज्यातील नागरिकांसाठी आवश्यक आहे. कामुर्लीतील जेटी कॅप्टन ऑफ पोर्ट येथे ठेवण्यात येईल. कामुर्लीत जेटी उभरण्याचा आमचा प्रस्ताव नाही, असे मंत्री लोबो म्हणाले.
सरकारचे साटेलोटे होते का? : कविता कांदोळकर
जिल्हा पंचायत सदस्य कविता कांदोळकर म्हणाले की, कामुर्लीत जेटी का आणली. याबाबत कोणाला काहीच माहीत नव्हते. आमदाराही भाजपचे, व सरकारही भाजपचे. लोकांच्या मनात कॅसिनो आणण्याचा सरकारचा डावा आहे की काय,अशी भीती लोकांना होती. येत्या चार दिवसांत ही जेटी पणजीत वळविणार असल्याचे आश्वासन दिल्याचे कांदोळकर यांनी यावेळी सांगितले. अन्यथा मोर्चा काढण्याची तयारी कली होता। असे कांदोळकर म्हणाले.