कोल्हापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे जनतेने पाहिले आहे. भाजपने शिवसेनेवर कशाप्रकारे अन्याय केला आहे. त्यामुळे भाजपने विसरून जावे. त्यांना कधीच शिवसैनिकांचे मतदान मिळणार नाही. असा टोला राज्य नियोजन मंडळांचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी लगावला. ते महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलत होते.
क्षीरसागर पुढे म्हणाले, महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई जाधव यांना किमान 50 हजार मतांनी निवडून द्यायचे आहे.कोल्हापुरात नमो नमो चालणार नाही. भाजपनेच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. असा आरोप क्षीरसागर यांनी केला.
कोल्हापुरात भाजप विकासावर काही बोलत नाही. मातोश्रीवरून आलेला आदेश हा शिवसैनिकांसाठी अंतिम असतो. शिवसैनिक कधीही आदेश धुडकावत नाही. 2019 साली कोल्हापुरात भाजपने शिवसेनेबरोबर गद्दारी केली. त्यामुळे भाजपने विसरून जावे, की सेनेचे मत भाजपला मिळणार नाही. असे क्षीरसागर म्हणाले.