ऑनलाईन टीम / कोलकता
नरडा भ्रष्टाचार प्रकरणावरुन पश्चिम बंगालमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यामध्ये मंत्री फिरहाद हकीम, सुब्रता मुखर्जी आणि आमदार मदन मित्रा यांना अटक कऱण्यात आली आहे. याचा निषेध करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांची निदर्शने सुरु केली आहेत. याच कारणावरून सीबीआय कार्यालयावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे.
नरडा भ्रष्टाचार प्रकरणावरुन पश्चिम बंगालच्या एका मंत्र्यासह टीएमसीच्या चार नेत्यांना सीबीआयने अटक केली आहे. ही अटक विना नोटीस केली असल्याचे अटक केलेल्या लोकप्रतिनिधींनी स्पष्ट केलं. याच कारणामुले तृणमूलच्या कार्यकर्त्यांनू भाजपच्या विरोधात निदर्शने केली आहेत.
या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरळ सीबीआय कार्यालयात दाखल झाल्या व त्यांनी या अटकेला आव्हान देत, मला ही अटक करुन दाखवा असं म्हटलं आहे. तसेच टीएमसीच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटल आहे.