भारत-चीन संघर्ष, अर्थव्यवस्थेतील घसरण आणि काही जागतिक प्रतिकूल घडामोडी या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात चढउतार दिसून येत असले तरी एकूण कल तेजीचा आहे. विशेषतः औषध कंपन्या, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील कंपन्या आणि वाहन कंपन्यांच्या समभागांमध्ये आगामी काळात चढती कमान दिसून येऊ शकते. याखेरीज दोन दमदार परतावा देणारे आयपीओ या आठवडय़ात बाजारात दाखल होत आहेत. त्यांचाही विचार आवर्जून करता येईल.
सरत्या आठवडय़ात मुंबई शेअर बाजारामध्ये चढउतारांचा सिलसिला कायम राहिला असला तरी अपेक्षेप्रमाणे मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये तेजी दिसून आली. शुक्रवारी सप्ताहाच्या अखेरीस सेन्सेक्स 38,845 आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 11,504 वर बंद झाला. सरत्या आठवडय़ात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र आणि औषधनिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनीही सप्ताहावर आपला ठसा उमटवला. यामध्ये सर्वांत आघाडीवर राहिली ती डॉ. रेड्डी कंपनी. रशियन वित्तीय कंपनीशी कोरोना लसीची चाचणी आणि वितरणाबाबत झालेल्या करारामुळे या कंपनीचे समभाग 10 टक्क्मयांनी वधारून गेल्या 52 आठवडय़ातील उच्चांकी पातळीवर पोहोचले. लुपिन कंपनीच्या समभागातही 6 टक्क्मयांची वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यात या कंपनीच्या समभागात 80 टक्क्मयांची वाढ झाली आहे. येणाऱया काळातही कंपनीची अशीच घोडदौड कायम राहील असे दिसते. सिप्ला, अदानी पोर्टस, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, अदानी ग्रीन्स, ग्लेनमार्क, कॅडिला हेल्थकेअर, ग्रासिम इंडस्ट्रीज आदींच्या समभागांमध्ये चांगली तेजी दिसून आली. शुक्रवारी रियल्टी इंडेक्स दोन टक्क्मयांनी वधारला. हॅप्पीएस्ट माइंडस् टेक्नॉलॉजीच्या समभागांना गुंतवणूकदारांनी दिलेला भरघोस प्रतिसाद हे या आठवडय़ाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट ठरले. एचडीएफसी बँकेसंदर्भात अमेरिकेत खटला सुरू होण्याची शक्मयता व्यक्त करण्यात आल्याने बँकेचे समभाग 2 टक्क्मयांनी घसरले. बँकिंगबरोबरच वित्तीय संस्था आणि ग्राहकवस्तू निर्माण करणाऱया कंपन्यांच्या समभागात घसरण दिसून आली. शुक्रवारच्या सत्रामध्ये 164 कंपन्यांच्या समभागांनी 52 आठवडय़ातील उच्चांकी स्तर गाठला, तर 56 कंपन्यांचे समभाग नीचांकी स्तरावर गेले आहेत.
शेअर बाजाराचा एकंदरीत मूड किंवा कल पाहता तो तेजीचा दिसतो. भारत-चीन संघर्ष आणि घसरलेल्या जीडीपीचा फारसा नकारात्मक परिणाम बाजारावर झालेला नाही. उलट निफ्टी 11,200 वरुन 11,613 वर पोहोचला आहे. लवकरच तो 12,400 पर्यंत जाईल असा अंदाज आहे. सेबीने अलीकडेच दिलेल्या माहितीनुसार, पी-नोटस्च्या माध्यमातून भारतीय शेअर बाजारात ऑगस्टपर्यंत तब्बल 74 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. हा दहा महिन्यातील उच्चांक आहे. वास्तविक, मार्च महिन्यामध्ये ही गुंतवणूक फारशी न वाढल्याने काळजी व्यक्त केली जात होती. पण लॉकडाऊन होऊनही भारतातील गुंतवणूक वाढली आहे. भारताचा विकास दर उणे 10 टक्क्मयांच्या जवळपास राहणार असल्याचा अंदाज असला तरी इतर देशांच्या तुलनेने तो जास्तच असेल, असे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटते आहे. त्यामुळे शेअर बाजारात आता फार मोठे करेक्शन येण्याची शक्मयता दिसत नाही.
या आठवडय़ात फार्मा कंपन्यांच्या समभागांमधील तेजी कायम राहील. त्याबरोबरच पेट्रोल आणि गॅसची मागणी वाढू लागल्याने एचपीसीएल, बीपीसीएल, एमजीएल, आयजीएल, एचओईसी, गुजरात गॅस यांच्या समभागात तेजी दिसून येऊ शकते. अंबुजा सिमेंट, आयडीएफसी या समभागांची खरेदीही फायदेशीर ठरेल. येणारा सणासुदीचा काळ लक्षात घेता टाटा मोटर्ससह ऑटो कंपन्यांच्या समभागांमध्ये तेजीची शक्मयता आहे. त्यांची खरेदी आतापासूनच करता येईल. अशोक लेलँड कंपनीला 1400 ट्रकची ऑर्डर मिळाल्यामुळे या कंपनीच्या समभागाने सरत्या आठवडय़ात उसळी घेतली. हीच तेजी याही आठवडय़ात दिसून येऊ शकते. याखेरीज धानुरा ऍग्रीटेक या कृषीरसायन क्षेत्रातील कंपनीचे समभागही पोर्टफोलिओचा आलेख वधारतील. सध्या बँकिंग कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करताना आस्ते कदम भूमिका ठेवणेच हिताचे ठरेल.
कोरोना संकटामुळे मार्च महिन्यांपासूनच आयपीओ बाजार थंड होता. मात्र, आता अनेक कंपन्या आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहेत. चालू आठवडय़ात गुंतवणूकदारांसाठी तीन आयपीओ दस्तक देत आहेत. यापैकी केमकॉन स्पेशालिटीचा आयपीओ 21 सप्टेंबरला तर एंजल ब्रोकिंगचा आयपीओ 22 सप्टेंबर रोजी येणार आहे. केमकॉनच्या आयपीओची किंमत 338 ते 340 रुपये इतकी आहे, तर एंजल ब्रोकिंगने आयपीओसाठी 305 ते 306 असा दर निर्धारित केला आहे. या दोन्हीही कंपन्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे. याखेरीज कॅम्स अर्थात कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीचा प्रारंभिक समभागही आज विक्रीसाठी खुला होणार आहे. अत्यंत कमी जोखीम असणारी गुंतवणूक म्हणून याकडे पहावे लागेल.
गेल्या काही महिन्यात जुन्या गुंतवणूकदारांनी खरेदी केलेल्या अनेक समभागांचे विशेषतः स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांच्या समभागांचे मूल्य खाली गेल्याने ते चिंतेत होते. पण आता हळूहळू बाजार वधारत आहे. त्यामुळे हे समभाग फायद्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्यास त्यांची विक्री करुन नव्याने काही समभागांची निवड करता येईल.
बाजारात तेजीचा माहोल दिसू लागला असला तरी चढउतारांची मालिका कायम राहील. भारत-चीन संघर्ष, चीन-तैवानमध्ये वाढलेली युद्धखोरी, अमेरिकेकडून उचलली जाणारी पावले आणि संसदेच्या अधिवेशनातील घडामोडींवर लक्ष ठेवून दिशा ठरवणे रास्त ठरणारे असेल.
– संदीप पाटील