‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल : सांताक्रूझ मेरशी महामार्ग बाजूच्या खारफुटींची कत्तल प्रकरण
प्रतिनिधी /पणजी
सांताक्रूझ मेरशी दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूने शेकडो एकर जमिनीतील खारफुटी मरुन पडल्याच्या दैनिक ‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल घेऊन किनारी व्यवस्थापन समितीच्या अधिकाऱयांनी जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.
खारफुटी मोठय़ा प्रमाणात मरुन पडलेली आहेत तर काही खारफुटींना नव्याने पालवी येत असल्याचे अधिकारी म्हणाले. या खारफुटीच्या जमिनीत कोणीतरी घातक रसायन टाकून सर्व खारफुटी मारलेल्या आहेत की त्या रोगाने मरण पावल्या याचा शोध घ्यावा लागेल असे अधिकाऱयांनी सांगितले. अर्थात त्यासाठी त्या जमिनीतील मातीचे व पाण्याचे काही नमूने गोळा करुन ते तपासणीसाठी पाठविले जातील, असे पाहणीसाठी गेलेल्या अधिकाऱयांनी सांगितले.
शेती बंद झाल्याने खारफुटी वाढल्या
दरम्यान, यावेळी सांतापूझचे सरपंच व स्थानिक प्रभागातील पंच उपस्थित होते. आपल्याला या गोष्टीची काहीही कल्पना नाही. परंतु इथे या अगोदर शेतजमिनी होत्या. त्याठिकाणी शेती बंद झाल्याने खारफुटी वाढल्या आहेत. ते खारफुटीचे जंगल नाही. परंतु शेती बंद झाल्याने खारफुटी वाढत गेल्या आहेत, असे ते म्हणाले. पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱयांनी खारफुटी मरण पावलेल्या आहेत त्या मागील कारण शोधण्याची गरज व्यक्त केली.